इंदापूर तालुका सकल जैन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मुकमोर्चा
पहलगाममधील हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

इंदापूर तालुका सकल जैन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मुकमोर्चा
पहलगाममधील हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली
इंदापूर प्रतिनिधी –
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना देखील मुंबई विले पार्ले येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बेकायदेशीरपणे पाडल्याच्या निषेधार्थ इंदापूर तालुका सकल जैन समाजाच्या वतीने काळया फिती लावून इंदापूर तहसील कार्यालयावर दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला. श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहर अध्यक्ष धरमचंद लोढा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संपन्न झाला. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे यांना नरेंद्र गांधी, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
इंदापूर येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पासून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. संभाजी चौक, नेहरू चौक, मुख्य बाजारपेठ, शिवाजी चौक, बाबा चौक, जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, संविधान चौक ते मोर्चाचा समारोप इंदापूर तालुका प्रशासकीय भवन प्रांगणात करण्यात आला. मोर्चात इंदापूर, भिगवण, वालचंदनगर, पळसदेव, जंक्शन, निमगाव केतकी, निमसाखर, अंथुर्णे, लासूर्णे पंचक्रोशीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी डॉ. श्रेणिक शहा, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा पदाधिकारी सचिन बोगावत, वालचंदनगर येथील सारिका वैभव गांधी यांची भाषणे झाली. यावेळी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अतिरेक्यांचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मुंबई विले पार्ले येथील ३० वर्षांपूर्वीचे श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्या स तात्काळ बडतर्फ करावे, मंदिर पुन्हा बांधून द्यावे,जबलपूर येथे भाजप नेत्यांनी जैन समाजावर चुकीचे वक्तव्य केले आहे, संबंधित नेत्यांनी जैन समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागावी, मध्य प्रदेश येथे जैन साधूवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, असे प्रकार पुन्हा होवू नयेत यासाठी विशेष कायदा करावा, पायी विहार करणारे जैन साधू, साध्वी यांना सर्वत्र पोलीस संरक्षण मिळावे, जैन तीर्थक्षेत्रावरील वाढती अतिक्रमणे तात्काळ थांबवावीत या मागण्या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनास केल्या.
यावेळी महेंद्र बोगावत, पंकज दोशी, कमलेश गांधी, अमोल शहा, डॉ. शीतल शहा, प्रकाश बलदोटा, मिलिंद दोशी, महेंद्र गुंदेचा, पारसमल बागरेचा, अरुण दोशी, सागर दोशी, चंद्रशेखर दोशी, भारत दोभाडा, पीयूष बोरा, जवाहर बोरा, संदीप शहा, आदिकुमार गांधी, पवन भालेराव, डॉ. आशिष दोभाडा, सागर कस्तुरे सुकुमार गांधी, साजन चंकेश्वरा, बाहुबली गांधी, महावीर शहा, अरविंद गांधी, शेखर दोशी,भारत दोभाडा, मोहन दोशी, जवाहर दोशी, मनोज शहा, अभय रायसोनी, गिरीश मुनोत, संदीप बोगावत, किरण रायसोनी, संतोष गांधी, महेश रायसोनी, प्रकाश खाटेर,उत्कर्ष दोशी, प्रीतम भालेराव, अनिल गांधी, स्वप्नील शहा, अभय गांधी, डॉ. सुदर्शन दोशी, स्वरूप दोशी, स्वप्नील दोशी, सचिन गांधी, स्वराज गांधी, मंगेश गांधी, वकील वैभव गांधी, धनंजय गांधी, नंदिनी महावीर दोशी, मंजुषा विनोद दोभाडा उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ. संदेश शहा यांनी केले.
यावेळी मधुकर भरणे, भरत शहा, कृष्णा ताटे, हमीद आतार, प्रमोद राऊत, प्रवीण पवार, सोमनाथ जाधव, खुशाल कोकाटे या मान्यवरांनी मोर्चास पाठिंबा दिला.