कागलच्या छत्रपती शाहू साखर कारखान्यानं दिलं ऊस आंदोलन चळवळीला बळ, शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्याची घोषणा
आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ असल्याचंही घाटगे यावेळी म्हणाले.

आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ असल्याचंही घाटगे यावेळी म्हणाले.
आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ असल्याचंही घाटगे यावेळी म्हणाले.
प्रतिनिधी
केंद्र सरकारने एक रकमी एफआरपी देण्याचे स्पष्ट केले असेल तरी राज्य सरकारने अजून कोणतीच भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सोमवारी केली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरीकेंद्री विचारांचा वारसा जपत आपल्या बळीराजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी शाहू समूह कायम तत्पर आहे असेही त्यांनी म्हटले आहे. शाहू कारखाना शेतकऱ्यांना ऊसदर देण्यात कायमच महाराष्ट्रात पुढे राहिला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या विरोधात शेतकरी संघटनेला दरासाठी कधीच आंदोलन करावे लागलेले नाही. याउलट शाहू कारखाना चांगला दर देतो मग तुम्हांला काय धाड भरली आहे का.? अशी विचारणा संघटना करत आल्या आहेत.आताही शाहू कारखाना एकरकमी एफआरपी देणार असल्याने राज्यातील सर्व कारखान्यावर त्याचा नक्कीच दबाव वाढणार आहे.एका अर्थाने ऊसदराच्या चळवळीला त्याचे बळ मिळणार आहे.
महापुरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं समरजित घाटगे यांनी सांगितलं. राज्यातील इतर साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली आहे. कारखानदारी पूर्णपणे सावरली आहे असं चित्र नाही. मात्र, आर्थिक ताळमेळ पाहता एकरकमी एफआरफी शक्य असल्याचंही घाटगे यांनी म्हटलंय. आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ असल्याचंही घाटगे यावेळी म्हणाले.