राज्यातील बारा साखर कारखाने लिलावात प्रक्रियेत;उपमुख्यमंत्री अजित पवार
मी म्हणालो होतो मतांचं ओझं टाका. त्यांनीही इतकं ओझं टाकलं की मी पार आडवाच व्हायची वेळ आलीय.

राज्यातील बारा साखर कारखाने लिलावात प्रक्रियेत;उपमुख्यमंत्री अजित पवार
मी म्हणालो होतो मतांचं ओझं टाका. त्यांनीही इतकं ओझं टाकलं की मी पार आडवाच व्हायची वेळ आलीय.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राज्यात अजूनही बारा साखर कारखाने लिलावात निघणार आहेत, ज्यांना हे कारखाने चालवायला घेण्याची ऐपत असेल, कारखाने चालवायचे असतील त्यांनी ते जरूर घ्यावेत असे आवाहन केले.
दोन दिवसापूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत राष्ट्रवादीचे सोमेश्वर विकास पॅनल निवडून आले. हे पॅनल निवडून येताना या पॅनलमधील बहुतेक सर्वच उमेदवार 16 ते 17 हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तुलनेत सर्वाधिक मतांनी हा विजय झाला आहे.
या निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशी गळीत हंगामाचा शुभारंभ असल्याने अजित पवार सोमेश्वर नगर येथे आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी साखर कारखान्यांच्या संदर्भातील ही माहिती दिली.
राज्यातील अजूनही बारा साखर कारखाने लिलावात या प्रक्रियेत असून त्यांची टेंडर्स निघणार आहेत. ज्यांना धमक असेल, ज्यांना ते कारखाने चालवायची इच्छा असेल त्यांनी ते चालवायला घ्यावीत असे आवाहन त्यांनी केले.