इंदापूर

नीरा भीमा कारखान्याचा रु.२५०० प्लस दर जाहीर

हर्षवर्धन पाटील यांची घोषणा

नीरा भीमा कारखान्याचा रु.२५०० प्लस दर जाहीर

हर्षवर्धन पाटील यांची घोषणा

इंदापूर: प्रतिनिधी

शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन २०२१-२२ या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन रु. २५०० प्लस दर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी शनिवारी (दि.२३) शहाजीनगर येथे केली.

शनिवारी कारखान्याच्या संचालक मंडळाची ऊस दरासंदर्भात बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रु. २५०० पेक्षा अधिकचा दर दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

चालु हंगामात कारखाना ७ लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार आहे. तर इथेनॉलचे १ कोटी ६० लाख लि., सेंद्रिय बॅग २ लाख निर्मिती, १५ लाख घनमीटर बायोगॅस निर्मितीचे आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून ४ कोटी ५० लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.तसेच कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची देय रक्कम रु. ११९ प्रमाणे दिवाळीपूर्वी बँक खात्यात वर्ग केली जाईल. तर कामगारांना ८.३३ बोनस देण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक डी.एन.मरकड उपस्थित होते.

Related Articles

Back to top button