फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं एका तरुणानं संतापाच्या भरात आत्महत्या
शनी पेठ पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं एका तरुणानं संतापाच्या भरात आत्महत्या
शनी पेठ पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणानं संबंधित फायनान्स कंपनीकडून एक महागडा मोबाईल फोन खरेदी केला होता. पण या कर्जाचे हफ्ते थकले होते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी फायनान्स कंपनीचे काही वसुली कर्मचारी मृताच्या घरी आले. त्यांनी दुचाकी घेऊन जाण्याची धमकी दिली. कर्मचाऱ्यांनी केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आशुतोष पाटील असं आत्महत्या केलेल्या 29 वर्षीय युवकाचं नाव असून तो जळगावातील योगेश्वरनगर येथील रहिवासी आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष यानं काही दिवसांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन एक महागडा मोबाईल फोन खरेदी केला होता. पण आर्थिक अडचणींमुळे तो कर्जाचे हफ्ते देऊ शकला नाही. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी फायनान्स कंपनीचे काही वसुली कर्माचारी आशुतोषच्या घरी आले. त्यांनी दुचाकी उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली.
दरम्यान आजूबाजूचे काही लोकंही याठिकाणी जमले होते. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन अपमान केल्यानं संतापाच्या भरात आशुतोषनं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानं घरात कोणी नसताना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान आशुतोषचे वडील हॉटेलवर तर आई बाहेर गेली होती. शनी पेठ पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.