जरंडेश्वर साखर कारखान्याशी आपला काही एक संबंध नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार
गेल्या काही दिवसांत इतर अनेक संस्थानीं चौकशी केली, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही.

जरंडेश्वर साखर कारखान्याशी आपला काही एक संबंध नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार
गेल्या काही दिवसांत इतर अनेक संस्थानीं चौकशी केली, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
कारखाना तोट्यात गेल्यामुळे माझ्या नातेवाईकांनी तो चालवण्यास घेतला होता. त्यांनी रितसर परवानगी घेऊन कारखान्याच क्षमता वाढवली आहे, असं अजित पवार म्हणाले.
आज (शुक्रवार, 2 जुलै) एक पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्याशी संदर्भात आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलं.
पवार म्हणाले, मुंबई हाय कोर्टाने साखर कारखान्यांना 1 वर्षाची मुदत द्यायला सांगितली होती. त्यानंतर ते कारखाने विक्रीस काढण्यास सांगितले होते. त्यामध्ये जरंडेश्वर कारखानाही होता. तो कारखाना घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यानी टेंडर दाखल केल होतं. गुरू कमोडिटी कंपनीने तो कारखाना खरेदी केला. तो कारखाना BVG ग्रुपने तो कारखाना चालवण्यासाठी मागितला. पण त्यांना पहिल्या वर्षात तोटा झाला. त्यानंतर माझ्या नातेवाईकांनी तो चालवायला घेतला. त्यांनाही त्यात तोटा झाला. त्यांनी रितसर परवानगी घेऊन कारखान्याची कॅपसिटी वाढवली. त्यासाठी कर्ज घेतलं, त्यात पुणे जिल्हा सहकारी बँक आणि इतर बँक आहेत. त्याचं रिपेमेंट व्यवस्थित चालू आहे. तो गुरू कमोडिटी च्या नावाने असल्याने ईडीने त्यावर टाच आणली आहे.
ईडीला चौकशी करण्याचा अधिकार आहे. गेल्या काही दिवसांत इतर अनेक संस्थानीं चौकशी केली, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे जप्तीविरोधात जरंडेश्वर कारखाना न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाईल. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांच काम त्या कारखान्यावर अवलंबून आहेत, असंही पवार यांनी म्हटलं.
जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती प्रकरण काय आहे?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे.
हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजेंद्र घाडगे सध्या या कारखान्याचं काम पाहतात.