बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते!भारत- पाक युध्दावर शरद पवारांचे सुचक वक्तव्य
भारतीय सशस्त्र दलांच्या धाडसी कारवाईचं कौतुक केलं आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचं अभिनंदनही केलं

बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते!भारत- पाक युध्दावर शरद पवारांचे सुचक वक्तव्य
भारतीय सशस्त्र दलांच्या धाडसी कारवाईचं कौतुक केलं आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचं अभिनंदनही केलं
बारामती वार्तापत्र
भारत पाकिस्तानमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय लष्कराने रणनीती आखली आहे. २७ निष्पाप भारतीय पर्यटकांना दहशतवादांनी मारल्यानंतर भारताने चांगलाच बदला घेतल्याची भावना भारतीय नागरीकांमध्ये आहे.
यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी,’बोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची’ असते,अशा मोजक्या शब्दात सुचक वक्तव्य केले आहे. शरद पवार हे त्यांच्या माळेगांव येथील गोविंदबाग निवासस्थानी ( दि ९ ) मुक्कामी दौऱ्यावर होते. आज शनिवारी(दि १०) पवार बाहेरगावी दौऱ्यावर निघाले होते.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पवार यांंनी भारत पाक युध्दावर सुचक वक्तव्य करीत भारताने केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी बारामती येथील निवासस्थानी शिक्षण विकास मंच कार्यकर्त्यांनी, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सहकाऱ्यांशी शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या आमूलाग्र बदलांविषयी रचनात्मक चर्चा केली.या चर्चेत डॉ. वसंत काळपांडे, भाऊ गावंडे, बसंती रॉय, दत्ता बाळसराफ, डॉ. माधव सूर्यवंशी, योगेश कुदळे व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.तसेच काही नागरीकांनी देखील पवार यांची भेट घेतली.
शरद पवारांकडून केंद्र सरकारचं कौतुक
दरम्यान, ऑपरेशन ‘सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या धाडसी कारवाईचं कौतुक केलं आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचं अभिनंदनही केलं. या कठीण काळात केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिल्याचंही त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केलं होतं.
भारताकडून पाकिस्तानचे हवाई तळं उद्ध्वस्त
शनिवारी सकाळी भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून मोठी कारवाई केली. या विमानांनी क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने तीन ते चार प्रमुख हवाई तळांवर अचूक हल्ले चढवले. विशेषतः रावळपिंडीजवळील नूर खान हवाई तळ हे मुख्य लक्ष्य होतं, तर मुरीद आणि सुकूर या तळांवरही जोरदार हल्ले करण्यात आले. या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं असल्याची माहिती समोर येत आहे. भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स यंत्रणेला चकवा देत अत्यंत अचूकपणे लक्ष्यांवर आदळत जबरदस्त परिणाम साधला. ही कारवाई भारतासाठी एक मोठं यश मानली जात आहे.