इंदापूर

३ वर्षांपासून पोलीस भरतीचा प्रश्न प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांनी केक कापून सरकारचा व्यक्त केला निषेध

विद्यार्थ्यांनी सरकारवर केला संताप व्यक्त

३ वर्षांपासून पोलीस भरतीचा प्रश्न प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांनी केक कापून सरकारचा व्यक्त केला निषेध

विद्यार्थ्यांनी सरकारवर केला संताप व्यक्त

इंदापूर : प्रतिनिधी

गेल्या ३ वर्षांपासून पोलीस भरतीचा प्रश्न प्रलंबित असल्याने आज दि.२५ रोजी इंदापूर क्रीडा संकुल या ठिकाणी पोलीस भरतीसाठी अनेक दिवसांपासून नियमित सराव करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी सरकारचा जाहीर निषेध लिहिलेला केक कापून संताप व्यक्त केला.

राज्यात २०१८ नंतर पोलीस भरती घेण्यात आलेली नाही. पोलीस भरती घेण्यासंदर्भात गृहमंत्री व इतर मंत्र्यांकडून घोषणा खूप झाल्या आहेत, पण अजूनपर्यंत पोलीस भरतीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलीस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घेण्यात आले होते. परंतु पुढे कोणतीही प्रक्रिया राबविली गेली नाही.

 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बहुसंख्य उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, बहुसंख्य मुले ही कष्टकरी, शेतकरी, मजुरांची आहेत. ही मुले शहराच्या ठिकाणी राहून रात्रंदिवस एक करत अभ्यास करतात, अभ्यासिका (क्लास) लावतात, पुस्तके व मेस इत्यादीचा होणारा मोठा खर्च त्यांना पेलवत नाही. ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे, विद्यार्थी नैराशात गेलेले आहेत, त्यांचे पालकसुद्धा खचून गेले आहेत.त्यामुळे या विद्यार्थ्यांपुढे खूप मोठे संकट उभे राहिले असून सरकार ही बाब गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न या विद्यार्थ्यांनपुढे उभा राहिला असून महाराष्ट्र सरकार भरती प्रक्रिया राबवून या विद्यार्थ्यांना कधी न्याय देणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!