इंदापूर

आगामी निवडणुकांमध्ये पक्ष श्रेष्ठींचे आदेश अंतिम मानून कामाला लागा – ॲड. राहुल मखरे

पहलगाम हल्ल्या नंतर भारता बरॊबर कोणताही देश उभा नव्हता.

आगामी निवडणुकांमध्ये पक्ष श्रेष्ठींचे आदेश अंतिम मानून कामाला लागा – ॲड. राहुल मखरे

पहलगाम हल्ल्या नंतर भारता बरॊबर कोणताही देश उभा नव्हता.

इंदापूर; प्रतिनिधी

इंदापूर रेस्ट हाऊस येथे (दि. १५) रोजी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष श्रेष्ठींचा आदेश अंतिम मानून काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते ॲड.राहुल मखरे यांनी केले.

बैठकीत बोलताना ते म्हणाले की, पक्षश्रेष्ठींना तालुक्याची राजकीय, सामाजिक, आणि भौगोलिक परिस्थितीची जाणीव असते. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना विजयी करून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करा.

आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचाच प्रचार करायचा आहे. भविष्यात तुमच्या कामाची दखल घेऊन योग्य ती संधी तुम्हाला दिली जाईल असेही मखरे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासित केले.

पहलगाम हल्ल्या नंतर भारता बरॊबर कोणताही देश उभा नव्हता. पूर्वी बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंका भारताची मित्र राष्ट्र होती. आताच्या नेतृत्वाच्या केवळ चमकोगिरी धोरणामुळे तिन्ही देश चीन कडे झुकले आहेत. आमच्या देशाची सुरक्षा व सार्वभौमत्व याबाबत मोदी अपयशी प्रधानमंत्री आहेत.
याविषयी सर्वसामान्य लोकांच्यात चर्चा घडवून आणल्या पाहिजेत असे ही पुढे बोलताना ते म्हणाले.

यावेळी सुखदेव चव्हाण, बाबासाहेब भोंग, महेश लोंढे, राहुल शिंगाडे, विकास भोसले, सुरज धाईंजे, नानासाहेब चव्हाण, ॲड. सुरज मखरे, बलभीम महाराज राऊत, नागेश भोसले, दया मखरे, आझाद सय्यद, अल्ताफ मोमीन, इम्रान बागवान, दादा आदलिंग, दादा गायकवाड असे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button