आताची सर्वात मोठी बातमी,पुढील तीन महिन्यांत राज्यातील चेकपोस्ट बंद होणार? केंद्राचं राज्याला परिपत्रक
परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर गृह विभागानं अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

आताची सर्वात मोठी बातमी,पुढील तीन महिन्यांत राज्यातील चेकपोस्ट बंद होणार? केंद्राचं राज्याला परिपत्रक
परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर गृह विभागानं अभ्यास गटाची स्थापना केली आहे.
मुंबई:प्रतिनिधी
राज्यातील चेक पोस्ट लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने राज्याला या संदर्भात तिसरे परिपत्रक पाठवले आहे. तसेच परिवहन विभागाला अहवाल सादर करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. सगळे कर ऑनलाईन झाल्यानंतर आता चेकपोस्टही बंद करण्याची तयारी सरकारने केली आहे.
चेकपोस्टचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची नेमणूक करण्यात आली आहे. चेकपोस्ट बंद होताना काय परिणाम होतील, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास होणार आहे.
5 सदस्यीय अभ्यास गटाची निर्मिती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यास गटाची निर्मिती करण्यात येणार आहे. परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
लवकरच राज्यातील चेकपोस्ट बाबात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर सीमा तपासणी नाके, म्हणजेच चेक पोस्ट बंद करण्याबाबत अभ्यासगट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा अभ्यासगट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होती आणि त्यावरच्या उपाययोजनांच्या बाबतीच अभ्यास करुन एक अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर चेंक पोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘ या’ अधिकाऱ्यांचा अभ्यास असेल गटामध्ये समावेश
गृह विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर अभ्यास गटात परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल हा तयार केला जाणार आहे. तर इतर पाच सदस्यही या अभ्यास गटात सहभागी असतील. यात परिवहन उपायुक्त दिनकर मनवर, लेखा उपायुक्त तुळशीदास सोळंकी, परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांचा समावेश असणार आहे.
अभ्यास गट नेमकं काय काय करणार?
अभ्यास गटाद्वारे चेकनाके बंद करण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अभ्यास करेल. त्याचप्रमाणे जर चेक पोस्टबंद करण्याचा निर्णय झाला, तर त्याची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे करायची, याचाही अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील 3 महिन्यांत राज्यातील सर्व चेकपोस्ट बंद होण्याची शक्यता आहे.