स्थानिक

आनंदाची बातमी! बारामतीची गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली रेल्वेसेवा पूर्ववत होणार

तीस रुपये तिकीटाचा दर असल्याने अनेकांना प्रवासासाठी अत्यंत स्वस्त पर्याय म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.

आनंदाची बातमी! बारामतीची गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली रेल्वेसेवा पूर्ववत होणार

तीस रुपये तिकीटाचा दर असल्याने अनेकांना प्रवासासाठी अत्यंत स्वस्त पर्याय म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.

बारामती वार्तापत्र

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रेल्वे संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व रेल्वे गाड्या करोना पूर्वीप्रमाणेच धावतील. म्हणजेच आता गाड्या जुन्या क्रमांकावरून धावतील. मंत्रालयाने आता विशेष क्रमांकावरून धावणाऱ्या ट्रेनला नियमित रेल्वे क्रमांकावर धावण्याचे आदेश दिले आहेत.

एसटीचा संप सुरु असतानाही रेल्वेसेवेची कमतरता प्रकर्षाने जाणवली. सर्व जनजीवन सुरळीत सुरु झालेले असताना रेल्वे सेवा पूर्ववत का केली जात नाही, असा लोकांचा प्रश्न आहे. वारंवार मागणी होऊनही ही सेवा पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने लोक नाराज आहेत.

पुणे-दौंड-बारामतीची रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. याचा फायदा चाकरमानी आणि इतर प्रवाशांना होणार आहे. बारामतीची रेल्वे सेवा ११ एप्रिल पासून सुरु करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.

दौंड रेल्वे स्टेशनवरून रेल्व क्र. १५२३ ही गाडी सकाळी ५.४५ वाजता निघेल आणि सकाळी ७ वाजता बारामती रेल्वे स्टेशनला येईल. तसेच रेल्वे क्र.१५२६ बारामती स्टेशनवरून ७.१० वाजता निघेल आणि दौंडला सकाळी ८.२० वाजता पोहोचेल. दौंडवरून सकाळी ८.२५ वाजता दौंडवरून निघेल आणि सकाळी १०.०५ पुण्याला पोहोचेल.

रेल्वे क्र.१५३२ ही बारामतीवरून रात्री १०.२५ वाजता निघेल आणि दौंड येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल. या रेल्वे ११ एप्रिलपासून सुरु होतील. यापुर्वी सुरु असलेल्या सेवाही सुरु राहतील. रेल्वे क्र. १५२५ सकाळी ९.४० वाजता पुण्याहून निघेल आणि दौंड येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल. रेल्वे क्र.१५२७ ही दुपारी २.५५ वाजता दौंडवरून निघेल आणि ही रेल्वे दुपारी ४.१० वाजता बारामती स्टेशनला पोहोचेल. रेल्वे क्र.१५२८ ही गाडी बारामतीहून ४.५० वाजता निघेल आणि ती रात्री ७.४५ वाजता पुण्याला पोहोचेल. रेल्वे क्र.१५३० ही गाडी संध्याकाळी ६.४५ वाजता निघेल आणि रात्री ९.३५ वाजता बारामती स्टेशनला पोहोचेल.

दरम्यानच्या काळात या गाड्या सुरु होत्या, मात्र कोरोना काळात त्या बंद झाल्या होत्या. आता कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने या रेल्वे गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button