राजकीय

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार – जयंत पाटील

शुक्रवारी त्यांचा प्रवेश होईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार – जयंत पाटील

शुक्रवारी त्यांचा प्रवेश होईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

शुक्रवारी त्यांचा प्रवेश होईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश होणार आहे.

खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असंही पाटील यांनी म्हटलंय.

खडसे यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजपचा राजीनामा दिल्याचं पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपचे काही आमदारही राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहेत. ते कोरोनाचा काळ संपल्यानंतर येतील असं पाटील यांनी सांगितलं आहे.
तत्पूर्वी बीबीशी बोलताना ‘मी भाजपचा राजीनामा देणार आहे,’ असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं होतं.

गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती आज संपुष्टात आली आहे.

आता फक्त खडसेंनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असं पाटील यांनी स्पष्ट केलंय.

महाआघाडी सरकार 5 वर्षांपेक्षा जास्त काळ चालेल, तसंच आठ ते दहा दिवसात भाजपच्या तीन ते चार मोठ्या नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे, तेही पक्षात यायला उत्सुक आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

खडसेंनी पक्ष सोडणं दुंःखद – मुनगंटीवार
“पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, खडसेंसारख्या नेत्याने पक्षाची 40 वर्षं सेवा केली आहे. त्यांनी जाऊ नये असं मला सतत वाटायचं,” अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

“हे धक्कादायक आणि दुःखद आहे, त्यांच्या मनात खंत होती, माझ्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटायचं, तो चर्चेतून संपेल असं वाटायचं,” असंही मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.

Related Articles

Back to top button