कृषी आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ म्हणजे पळशीवाडी पतंग यात्रा

वर्षानुवर्ष वाढता प्रतिसाद यंदाचे अकरावे वर्ष

कृषी आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ म्हणजे पळशीवाडी पतंग यात्रा

वर्षानुवर्ष वाढता प्रतिसाद यंदाचे अकरावे वर्ष

बारामती वार्तापत्र

कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण समाजाचे नेहमीचे नाते निर्माण करणाऱ्या अनोख्या पतंग यात्रेचे आयोजन करण्यात येते , यंदाचे हे ११ वर्ष असून महाराष्ट्रातील हा एकमेव आणि अधिकृत पंतग महोत्सव आहे.

श्रावण महिन्याच्या नागपंचमीला सणाला पतंग उडवणे, हीच खरे तर आपल्या महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे.

केवळ आजच्या धावपळीच्या वेळापत्रकामुळे आणि शहरातील जागेच्या कमतरतेमुळे प्रत्येकाला पतंग उडवण्याचा आनंद घेता येत नाही , तसेच ग्रामीण भागात “वावडी उडवणे ही ही प्रता आता विसमरणात गेली आहे , त्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा हा प्रयत्न आहे .

आमच्या पळशी गावातील “गजी नृत्य” सारख्या विविध लोकनृत्याचे ही पुन्हा लोकांना दर्शन घडवणे आवश्यक आहे, हे सर्व लक्षात घेऊनच या सर्वांचा समावेश असलेली पतंग जत्रा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते , विशेष म्हणजे दरवर्षी या जत्रेला प्रतिसाद वाढतो आहे , म्हणूच या वर्षी मोठ्या प्रमाणात हा महोत्सव होत आहे. दिनांक १३ ते १६ ऑगस्ट २०२१ दरम्यान बारामती कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र पळशीवाडी ता बारामती येथे साजरा होत असून , यात्रे साठी १ दिवस , १ रात्र , २ दिवस ३ रात्र मुक्कामाचे पॅकेज तयार करण्यात आले आहेत, या मध्ये पतंग, दोरा, सह ग्रामीण चवीचे भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. विशेष आकर्षण : वावडी बनवण्याची स्पर्धा ही आयोजित केली आहे , विजेत्यांना जागेवरच रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

या यात्रे च्या निम्मिताने पर्यावरण , संस्कृतीचेच जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो , वड पिंपळ,चिंच , निंब अशा स्थानिक रोप वृक्षारोपण आयोजित केले आहे. या मुळे परिसरातील वनराई वाढून एकूणच वनरक्षण, जलरक्षण, आणि भुरक्षण केले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!