कृषी

कृषी विज्ञान केंद्र, बारामतीला ‘सर्वोत्तम विभागीय केव्हीके’ पुरस्काराने सन्मानित

शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

कृषी विज्ञान केंद्र, बारामतीला ‘सर्वोत्तम विभागीय केव्हीके’ पुरस्काराने सन्मानित

शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

बारामती वार्तापत्र

एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांना नॅशनल अकॅडमी ऑफ एग्रीकल्चर सायन्सेस (NAAS), नवी दिल्ली आणि धानुका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्वोत्तम विभागीय केव्हीके – अटारी झोन 8’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार 6 जून 2025 रोजी ए. पी. शिंदे कॉन्फरन्स हॉल, इंडियन कौन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च (ICAR), नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

अटारी झोन 8 अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील एकूण 82 कृषी विज्ञान केंद्रांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी केंद्राच्या मागील पाच वर्षांतील कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला. संबंधित पुरस्कार NAAS चे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक, उपाध्यक्ष डॉ. बी. एस. धिल्लन, धानुका ग्रुपचे चेअरमन श्री अग्रवाल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्राचे प्रमुख डॉक्टर धिरज शिंदे यांनी स्वीकारला.

संबंधित पुरस्कार नॅशनल अकॅडमी ऑफ एग्रीकल्चर सायन्सेस या संस्थेच्या 32 व्या जनरल मीटिंग व फाउंडेशन डे यानिमित्ताने ठेवण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यक्रमांमध्ये देण्यात आला. NAAS ही संस्था संपूर्ण देशातील कृषी व कृषी निगडित क्षेत्रातील होणाऱ्या संशोधनाचे मूल्यमापन मागील 30 वर्षापासून करत आली आहे. तसेच ही संस्था भारतातील प्रकाशित होणाऱ्या सर्व संशोधन पत्रिका (रिसर्च पेपर जर्नल) यांचे मूल्यांकन ही करते.

एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पवार व संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या उल्लेखनीय कार्याची ठळक वैशिष्ट्ये:
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा ऊस लागवडीत प्रभावी वापर, ज्याचे कौतुक मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी पण केले आहे.

शेतकऱ्यांसाठी उन्नत पिकांच्या जातींचा प्रसार, कलमी भाजीपाला रोपांची निर्मिती, मूल्यवर्धन साखळी निर्माण आणि उद्योजकतेला चालना देणे.
50 हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना मार्गदर्शन प्रदान करणे.

मृदा परीक्षण प्रयोगशाळा, जैविक प्रयोगशाळा, फिशरी, मिलेट प्रोसेसिंग युनिट, बियाणे प्रक्रिया विभाग, डेअरी विभाग, भाजीपाला व फळबाग रोप नर्सरी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे.
वर्षभर विविध प्रकारची प्रशिक्षणं, प्रात्यक्षिकं, प्रक्षेत्र भेटी आणि कृषी प्रदर्शनं आयोजित करून शेतकऱ्यांना ग्रामीण युवाना, विद्यर्थ्याना तसेच सर्व स्थारतील अधिकार्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणे. ज्यामुळे उद्योजक निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे.

मागील दहा वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र “कृषक” सारख्या प्रात्यक्षिकावर आधारित कृषी प्रदर्शनाद्वारे देश भरातील लाखो शेतकऱ्यांपर्यंत कोणत्या पद्धतीने वास्तविक स्वरूपात तंत्रज्ञान कसे पोहोचवता येईल याचे उदाहरण सादर केले आहे.
कृषक सोबतच वर्षभरामध्ये कृषी विज्ञान केंद्र धान्य महोत्सव, चैत्र पालवी, भीमथडी, खरीप व रब्बी मिळावे, कौशल्य आधारित प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, कृषिक अॅप यासारख्या असंख्य उपक्रमाद्वारे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान प्रसाराचे मोलाचे काम करीत आहे.

या पुरस्काराबद्दल एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री. राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, विश्वस्त श्री. विष्णुपंत हिंगणे आणि कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नलावडे यांनी केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कृषी विज्ञान केंद्र, बारामती मुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. तसेच एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या कार्यामुळे आजचा युवा वर्ग कृषी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.

Related Articles

Back to top button