मुंबई

नवाब मलिकांबाबत मोठा निर्णय,त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार

न्यायालयीन कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याचे निश्चित करण्यात आले.

नवाब मलिकांबाबत मोठा निर्णय,त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार

न्यायालयीन कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याचे निश्चित करण्यात आले.

मुंबई :  प्रतिनिधी

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. एकीकडे भाजपने राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर कोर्टात ही मलिक यांना अजूनही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलावलेली आहे.

त्याबाबत आता एक मोठा निर्णय समोर आला आहे.

नवाब मलिक यांच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार दुसऱ्यांकडे देण्याबाबत बैठकीत चर्चा ( Nawab Malik Will Not Resign ) झाली. धनंजय मुंडे आणि प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवावा असा निर्णय झाला. परभणीच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार धनंजय मुंडे तर गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार प्राजक्त तनपुरेंकडे द्यावा, असे बैठकीत ठरवण्यात आले. मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.

प्रमुख नेते बैठकीत सहभागी

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल तसेच राज्यात होत असलेल्या महत्वाच्या घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. मुंबईतील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरु झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार , जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदींसह राष्ट्रवादीचे मंत्री व प्रमुख नेते उपस्थित होते.

मलिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती

मलिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होता मात्र तो मिळाला नाही, म्हणूनच 31 मार्च हे फायनान्शियल इयर एन्ड असल्यामुळे पर्यायी जबाबदारी देण्याचा आमचा विचार आहे. असेही त्यांनी सांगितले. तसेच फडणवीसांनी जो पेनड्राईव्ह दाखवून आरोप केले त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. पेनड्राईव्हचा खरेखोटेपणा आहे. असे अनेक पेनड्राईव्ह निघू शकतात, त्याची सत्यता पडताळणी केली पाहिजे, त्या आधीच आपण सगळे बोलत आहोत. असे पेनड्राईव्ह आणि खासगी चर्चा रेकॉर्ड व्हायला लागल्या, तर काम करणं अवघड होईल, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच 2024 पर्यंत आमचं सरकार राहणार आहे, हे त्यांनी पहिल्यांदा मान्य केलंय. महाविकास आघाडी तर्फे त्यांचे आभार मानतो, असा टोलाही जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला आहे.

Related Articles

Back to top button