स्थानिक

राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी चालविण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा !- प्रशांत सातव

बारामती दौंड इंदापूर या तीन तालुक्यातील बेकादेशीर प्रवासी वाहतूक बंद करावी

राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी चालविण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा !- प्रशांत सातव

बारामती दौंड इंदापूर या तीन तालुक्यातील बेकादेशीर प्रवासी वाहतूक बंद करावी

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकताच बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली ई-बाईक टॅक्सी चालवण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करत राज्यातील सर्व परिवहन कार्यालयाला निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन राज्य सरकारपर्यंत पोहोचून ऑटो रिक्षा चालकांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन केले होते.

ऑटो रिक्षा कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली व सरचिटणीस विलास भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. 21) सकाळी 11 वाजल्यापासून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करून निदर्शने केले असल्याचे पश्चिम महा. कृती समितीचे उपाध्यक्ष प्रशांत सातव यांनी सांगितले.
त्या अनुषंगाने सदरचे निवेदन बारामती इंदापूर दौंड ऑटो रिक्षा कृती समितीच्या वतीने कृती समितीचे पश्चिम महा. उपाध्यक्ष प्रशांत सातव यांच्या नेतृत्वाखाली व दौंड ऑटो रिक्षा महासंघांचे अध्यक्ष प्रा. डॉ. भिमरावं मोरे यांच्या हस्ते बारामती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र निकम यांना देण्यात आले.

बारामती येथे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळातील अस्पष्टता आणि असलेल्या त्रुट्या दूर करणे तसेच बारामती दौंड इंदापूर या तीन तालुक्यातील बेकादेशीर प्रवासी वाहतूक बंद करावी व त्यांना कायदेशीर प्रवाहात आणावे, शहरातील रिक्षा थांबे निश्चित करून तसे अधिकृत पत्र रिक्षा थांब्याला देण्यात यावी या व अशा अनेक मागण्या या निवेदनात मांडले आहेत.
सदरचे निवेदन राज्य शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगून आरटीओ अधिकारी सुरेंद्र निकम म्हणाले शहरात ऑटो रिक्षा व्यवसाय व्यवस्थितरित्या व रितसर करण्यासाठी अधिकृत थांबा असण्याची आवश्यकता आहे. आम्ही लवकरात लवकर सर्वे करून त्या त्या ठिकाणी ते थांबे अधिकृत करून देण्याचा प्रयत्न करू असे यावेळी सांगितले. तसेच ज्यांच्या ऑटो रिक्षा पासिंग करून घ्यावयच्या असतील त्या सर्वांनी एक जुटीने रिक्षा पासिंग करून घ्याव्यात असेही यावेळी सांगितले.
कायदा व सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन करून आंदोलन व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत (नाना) सातव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड ऑटो रिक्षा महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. भीमराव मोरे, आण्णा समिंदरे, किशोर कांबळे, उत्तम लोंढे, दादासो शिंदे, अशोक कांबळे, जावेद सय्यद, बाबासाहेब कोरी, अशोक काळे, सुरेश मोरे, राजेश बोर्डे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button