इंदापूर

बहुजन परिषद महाराष्ट्र राज्यच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी होणार कोरोना योद्ध्यांचा गुणगौरव

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून केला जाणार गुणगौरव

बहुजन परिषद महाराष्ट्र राज्यच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी होणार कोरोना योद्ध्यांचा गुणगौरव

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून केला जाणार गुणगौरव

इंदापूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी इंदापूर या ठिकाणी कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव बहुजन परिषद महाराष्ट्र राज्य यांकडून करण्यात येणार आहे.

इंदापूर तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.विशेषतः गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या काळात माणुसकीचे नाते जिवंत ठेवण्याचे काम केले आहे अशांचा गुणगौरव १५ ऑगस्ट रोजी इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

कोरोना काळात सामाजिक जबाबदारी या नात्याने जीव धोक्यात घालून ज्यांनी लोकांची मदत केली,सेवा दिली अशा १०१ विशेष अतिथींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी दिली.

यावेळी संघटनेचे सचिव विजय गायकवाड, कार्याध्यक्ष दत्ता बाबर,प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय राऊत, बहुजन परिषदेचे राज्य संघटक संजय कुचेकर इ.उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!