बारामतीतल्या महिलेचा देवदर्शनावरुन येतांना अपघाती मृत्यू.
दुचाकी व अवजड वाहनाच्या धडकेत एक महिला जागीच ठार; तर पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना राज्य रस्ता क्र. ५८ वर कुंजीरवस्ती येथील वळणावर घडली.

बारामतीतल्या महिलेचा देवदर्शनावरुन येतांना अपघाती मृत्यू.
दुचाकी व अवजड वाहनाच्या धडकेत एक महिला जागीच ठार; तर पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना राज्य रस्ता क्र. ५८ वर कुंजीरवस्ती येथील वळणावर घडली.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
अष्टविनायक गणपती पैकी एक प्रसिद्ध असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन बारामतीला माघारी चाललेल्या महिलेचा कुंजीर वस्ती जवळ अपघात झाला. या अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.
त्यावेळी थेऊर फाटा येथून कुंजीर वस्ती येथील वळणावर लिक्विड गॅस वाहतूक करणारे टँकर क्रमांक एम एच 46 48 97 डाव्याबाजूने करत होती यावेळी गाडीवरील महिलेचा तोल गेल्याने महिला टँकरच्या चाकाखाली आली त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तर श्रीकृष्ण प्रभूने हे टँकर च्या विरुद्ध बाजूस पडल्याने जखमी झाले श्रीकृष्ण प्रभूने सिद्धेश्वर गल्लीतील एक कुटुंब म्हणून ओळखले जाते त्यांच्या कुटुंबातील भाग्यश्री यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
भाग्यश्री श्रीकृष्ण प्रभुणे (वय २८, रा. सिद्धेश्वर गल्ली, बारामती, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर या अपघातात श्रीकृष्ण प्रभुणे (वय ३८) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण प्रभुणे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री प्रभुणे हे त्यांच्या हिरोहोंडा कंपनीच्या एम एच ४२ ए सी २२६० या मोटारसायकल वरून थेऊर येथील ”श्री चिंतामणी गणपतीच्या” दर्शनासाठी आले होते. दर्शन घेताल्यानंतर थेऊर कडून बारामतीच्या दिशेने घरी निघाले होते.
या अपघातात भाग्यश्री यांचा जागीच मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी करीत आहेत.
पुणे-सोलापुर महामार्ग (थेऊरफाटा) ते थेऊर गाव या रस्त्याची मोठ्या प्रमानात अतिशय दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या सुमारे एक ते दीड फुटाचे खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यासाठी या रस्त्याचे लवकर काम पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी या रस्त्यावरुन दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.