बारामतीत सुहासनगर मधील महिलांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर हंडा मोर्चा
बारामतीच्या सुहासनगरमध्ये ऐन पावसाळ्यात भेडसावतोय पाणी प्रश्न

बारामतीत सुहासनगर मधील महिलांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर हंडा मोर्चा
सुहासनगरमध्ये ऐन पावसाळ्यात भेडसावतोय पाणी प्रश्न
बारामती वार्तापत्र
बारामतीत शहरातील सुहासनगर भागात मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे येथील संतप्त महिलांनी सोमवारी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर हंडा मोर्चा काढला. त्यावर प्रशासनाकडून पाणी प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
बारामती येथे सुहास नगर अमराई या अनुसूचित जाती जमातीतील परिसरातील नागरिकांना पिण्याचे व वापरण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे हंडा नाद आंदोलन करावे लागले स्थानिक नगरसेवकांना आणि प्रशासनाला सांगून देखील त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.
भारतीय संविधान व नगरपालिका ॲक्ट मध्ये अनुसूचित जाती जमातीतील लोक राहत असणाऱ्या वस्त्यांचा विकास करणे व त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवने व त्याचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे असताना देखील बारामती शहरामध्ये पाणी ह्या मूलभूत प्रश्नासाठी दलित वास्त्यांन मधील नागरिकांना आंदोलन करावे लागत असेल तर हे खूप मोठे दुर्दैव आहे त्यामुळे तेथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा व त्याचे लाईट बिल नगरपालिकेने भरावे यासाठी आज बारामती नगरपालिकेच्या समोर महिलांनी हंडा नाद आंदोलन केले त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपीसाठी जर सोडवला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला व आंदोलनास पाठिंबा दिला. त्यावेळी तेथे अनिकेत मोहिते,सिद्धांत सावंत, भास्कर दामोदरे, गौरव अहिवळे, रोहन मागडे व आधी कार्यकर्त्यांनी यांनी देखील आक्रमक भूमिका मांडली.