पुणे

भर उन्हाळ्यात राज्याला लोडशेडिंगचा पुन्हा संकट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

रोज दोन तास लोडशेडिंग होणार आहे.

भर उन्हाळ्यात राज्याला लोडशेडिंगचा पुन्हा संकट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

रोज दोन तास लोडशेडिंग होणार आहे.

पुणे : विजेची वाढती मागणी आणि कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीत घट झाल्याने राज्यात वीजेची तूट निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी ‘महावितरण’कडून गरजेनुसार तात्पुरते भारनियमन करण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातल्या महावितरणच्या जवळपास तीन कोटी ग्राहकांना लोडशेडींगचा शॉक बसलाय. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात लोडशेडिंग होईल. मुंबईत भांडुप, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये लोडशेडिंग होणार नाही. राज्यात अडीच ते तीन हजार मेगावॅटचा तुटवडा आहे.  सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 10 या कालावधीत जपून वीज वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. 
वीज दरवाढीचाही शॉक
वीज दरवाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलीये. उष्णता वाढतेय त्यामुळे वीज मागणी वाढली आहे. मात्र बाजारात खरेदी करायला वीजच नाही, याकडे राऊत यांनी म्हटलंय. 
दरम्यान, राज्यात ऊन तापत असल्याने घरगुती वीज वापरासह औद्योगिक व कृषिपंपाचा वीजवापरदेखील वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी विक्रमी २८ हजार मेगावॉटच्या घरात गेली आहे. मुंबईत सुमारे ३२०० ते ३५०० मेगावॉट विजेची मागणी आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत चार हजार मेगावॉटने वाढ झाली आहे.
पंधरा दिवसांपासून ‘महावितरण’कडील विजेची मागणी सातत्याने २४ हजार ५०० ते २४ हजार ८०० मेगावॉट दरम्यान आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी लवकरच २५ हजार ५०० मेगावॉटवर जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी रात्रीच्या कालावधीतदेखील मागणी २२ हजार ५०० ते २३ हजार मेगावॉट आहे, असे ‘महावितरण’ने म्हटले आहे.
सौरऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या सौरपटलाचा वस्तू आणि सेवा कर पाच टक्क्यांहून 12 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. आता पाच टक्क्यांवरील सीमा शुल्कही केंद्र सरकारने एप्रिलपासून 40 टक्क्यापर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे राज्यातील सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांना खीळ लागण्याची शक्यता आहे.

वीजबचतीचे आवाहन

‘महावितरण’ला सध्या २५०० ते ३००० मेगावॉट विजेच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीजवाहिन्यांवर आगामी काळात नाईलाजास्तव अधिकचे भारनियमन करावे लागू शकते. हे टाळण्यासाठी वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button