पुणे
भर उन्हाळ्यात राज्याला लोडशेडिंगचा पुन्हा संकट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका
रोज दोन तास लोडशेडिंग होणार आहे.

भर उन्हाळ्यात राज्याला लोडशेडिंगचा पुन्हा संकट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका
रोज दोन तास लोडशेडिंग होणार आहे.
पुणे : विजेची वाढती मागणी आणि कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीत घट झाल्याने राज्यात वीजेची तूट निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी ‘महावितरण’कडून गरजेनुसार तात्पुरते भारनियमन करण्यास सुरुवात झाली आहे.
वीज दरवाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलीये. उष्णता वाढतेय त्यामुळे वीज मागणी वाढली आहे. मात्र बाजारात खरेदी करायला वीजच नाही, याकडे राऊत यांनी म्हटलंय.
वीजबचतीचे आवाहन
‘महावितरण’ला सध्या २५०० ते ३००० मेगावॉट विजेच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीजवाहिन्यांवर आगामी काळात नाईलाजास्तव अधिकचे भारनियमन करावे लागू शकते. हे टाळण्यासाठी वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.