इंदापूर

मंत्री असलो तरी पहिल्यांदा मी शेतकरी ; शेतकऱ्यांच्या भावना कॅबिनेट बैठकीत मांडणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

पालकमंत्र्यांकडून वीज जोडणी करण्याचे आदेश

मंत्री असलो तरी पहिल्यांदा मी शेतकरी ; शेतकऱ्यांच्या भावना कॅबिनेट बैठकीत मांडणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

पालकमंत्र्यांकडून वीज जोडणी करण्याचे आदेश

इंदापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विजेच्या प्रश्नावर संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ‘मी ही शेतकऱ्याचा मुलगा आहे,शेतकऱ्यांची संवेदना मी मंत्री मंडळासमोर मांडेन’ अशी ग्वाही देत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संभाजी बिग्रेडचे बंड थंड केले.

सविस्तर हकीकत अशी की,संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज कनेक्शन तोडणी व सक्तीची वीज बिल वसुली वरून पालकमंत्री भरणे यांना सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना टेंभुर्णी बायपास येथे घेराव घातला.

यावेळी बोलताना भरणे म्हणाले की,महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलाच्या संदर्भातील त्रुटी ताबडतोब दुरुस्त करून ज्यांची ऐपत आहे अशांकडून वीजबिल भरून घ्यावे. परंतु ज्या शेतकऱ्यांची ऐपत नाही त्यांना वेठीस धरू नये. कोरोनामुळे या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजार भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहे. पिण्याच्या पाण्या वाचून गुरांचे, माणसांचे हाल होत असतील तर ही बाब खेदजनक आहे. शेतकऱ्यांच्या भावना शासन दरबारी निर्णय घेणारे जे प्रमुख आहेत त्यांच्यासमोर मांडून शेतकऱ्यांना मुदत दिली पाहिजे यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने प्रयत्न करणार आहे.

प्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विज बिला मध्ये त्रुटी असल्याचे पालकमंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्याने मंत्री भरणे म्हणाले की, तुमचं शंभर टक्के बरोबर आहे. हे फक्त इथंच झालं नसून संपूर्ण महाराष्ट्रभर झालं आहे. यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने त्यांची अवस्था अडचणीचे आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय कानावरती येईल.

सोलापूर जिल्ह्याचे संभाजी बिग्रेड चे अध्यक्ष सचिन जगताप यावेळी म्हणाले की,पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून विद्युत रोहित्र सोडवण्याचे थांबवून तात्काळ विज बिल दुरुस्तीचे आदेश दिलेले आहेत. आमच्या शेतकरी बांधवानी आत्महत्या केली होती त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करू असे मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. परंतु शब्द पाळला नाही तर यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button