महामारी संपेलली नाही पुन्हा वाढतोय कोरोना! गेल्या 24 तासात Covid-19 च्या केसेसमध्ये तब्बल 65.7 टक्क्यांनी वाढ
केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून अलर्ट केलं आहे.

महामारी संपेलली नाही पुन्हा वाढतोय कोरोना! गेल्या 24 तासात Covid-19 च्या केसेसमध्ये तब्बल 65.7 टक्क्यांनी वाढ
केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून अलर्ट केलं आहे.
नवी दिल्ली, प्रतिनिधी
देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यात कोरोना रुग्णवाढ वेगानं होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून अलर्ट केलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहून कोरोना रोखण्यासाठी वेळीच पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दोन ते तीन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोनानंपुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. देशात कोरोनानं पुन्हा चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,067 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोविड प्रकरणांमध्ये 65.7 टक्के वाढ दिसून आली आहे. गेल्या 24 तासात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 522,006 झाली आहे.
देशात आतापर्यंत एकूण 1,86,90,56,607 लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 17,23,733 कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 12,340 आहे. गेल्या 24 तासांत 1547 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या 42513248 झाली आहे. मंगळवारी 1,247 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती?
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. या निर्णयाला 20 दिवस उलटत नाहीत तोवर आता केंद्राने पुन्हा एकदा अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीत याबाबत काय चर्चा होते का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आयपीएलमध्येही कोरोना
दिल्ली कॅपिटल्सच्या 5 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता या संघाच्या आजच्या सामन्याचं स्थळ बदलण्यात आलं आहे. आता हा सामना मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. दिल्लीची आज पंजाब संघाविरोधात मॅच होणार आहे. ती आधी पुण्याला होणार होती. मात्र संघातील फिजिओसह पाचजणांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रवास टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनमध्येही संसर्गात वाढ
चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार झाला आहे. शांघाई शहरात कोरोना नियंत्रणाबाहेर असल्याच चित्र आहे. चीनमध्ये गेल्या 24 तासांत 21 हजार 400 नवे रुग्ण आढळले. कोरोनानं मृत्यू होण्याची संख्याही वाढली आहे.