राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला इशारा
जर ते पूर्ण होत नसतील तर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल

राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला इशारा
जर ते पूर्ण होत नसतील तर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल
सोलापूर:प्रतिनिधी
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. जर आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होत नसतील. जर ते पूर्ण होत नसतील तर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल, असं त्यांनी म्हटलंय. एक पोलीस अधिकारी म्हणाला 2 किलोमीटर अंतर आहे. पण मी म्हटलं असू द्या. आता मागे फिरणार नाही. यापुढे आता पहिला टप्पा म्हणून 35 किलोमीटर चालायच आहे. रोज किलोमीटर वाढवूयात. लोकांमध्ये जाऊयात आपण, छत्रपती लोकांमध्ये राहतात हे दखवुन देऊ, असंही संभाजी छत्रपती म्हणाले.
आरक्षण हवं असल्यास मागासवर्गीय आयोग स्थापन करावा लागेल
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज हा मागासलेला नसून पुढारलेला असल्याचे सांगितलं. या निकालानंतर मी शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रपती सर्वांची भेट घेतली होतं असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजर्षी शाहू महाराजांनी वंचित घटकांना न्याय दिला, शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला. 1963 पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडेट क्लास म्हणून केंद्रात आरक्षण मिळत होतं. मात्र, मध्यंतरी काही आयोग निर्माण झाले आणि आरक्षण रद्द झाले.
मुख्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितलं. मात्र, सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी मागासवर्गीय आयोग निर्माण करावे लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राज्य शासन म्हणते की आमच्या हातात काही नाही, केंद्राने 50 टक्क्यांची मर्यादा वाढवा. पण, जर तुम्हाला आयोग स्थापन करता येत नसेल तर किमान कमिटी तर गठीत करा, समजाला मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. 70 टक्के मराठा गरीब आहे, हे सिद्ध करावं लागणार आहे, हेच समजवण्याचा प्रयत्न मी राज्य शासनाला करतोय मात्र आठ महिने झाले तरी काहीही निर्णय झालेले नाही.