मुंबई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार-मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अचानक बैठक; तब्बल दीड तास कशावर झाली चर्चा?

राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार-मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अचानक बैठक; तब्बल दीड तास कशावर झाली चर्चा?

राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

मुंबई –प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट  घेतली. सुमारे दीड तास मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात भेट झाली असून, या चर्चेदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय मुद्द्यावर खासकरून या बैठकीत चर्चा रंगल्या आहेत. पण सध्या राज्यात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद पाहायला मिळतो. राज ठाकरेंची औरंगाबाद सभा, भोंग्याचा मुद्दा, राणा दाम्पत्याला अटक, किरीट सोमय्यांवरील हल्ला या सगळ्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे याच विषयांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी असं बोललं जात आहे.

इतकंच नाहीतर या चर्चेदरम्यान, फक्त शरद पवार आणि मुख्यमंत्रीच उपस्थित होते. यावेळी राज्यातील विकास कामांच्या प्रकल्पांवरही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आहे. याविषयीदेखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक – 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्यासाठी बिगर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक मुंबईत होणार आहे. बिगर भाजपशासित जवळपास दहा राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असून या बैठकीबाबत च्या नियोजनाची देखील चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती मिळत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारच्या विरोधात भक्कम विरोधी पक्ष उभा करण्यासाठी सुरु असलेल्या मोर्चेबांधणी च्या माध्यमातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. मुख्यमंत्र्यांची ही बैठक नेमकी केव्हा होईल यावर अद्याप स्पष्टता असली तरी मुंबईत या बैठकीचे नियोजन केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button