स्थानिक

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा: तहसीलदार विजय पाटील

आतापर्यंत २५ लाभार्थ्यांना चेक वाटप करण्यात आले आहेत

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा: तहसीलदार विजय पाटील

आतापर्यंत २५ लाभार्थ्यांना चेक वाटप करण्यात आले आहेत

बारामती वार्तापत्र

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेमार्फत बारामती तालुक्यात जानेवारी २०२१ पासून ऑगस्ट अखेर एकूण ३० प्रकरणे दाखल करण्यात आली असून त्यापैकी २५ प्रकरणे मंजूर करण्यात आली व ५ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. मंजूर प्रकरणात मयताचे प्रत्येक वारसास २०,०००/- रू चे अनुदानाचे चेक चे वाटप करण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेमार्फत सन २००२-०७ चे दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयाची कुटुंब प्रमुख कमावती व्यक्ती मयत झालेपासून ३ वर्षाचे आत वारसदारांनी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज कागदपत्रासह तलाठी यांचेकडे दाखल करावेत.सदर प्रकरणे तहसिल कार्यालयात आल्यानंतर त्यावर निर्णय होवून मंजूर, नामंजूर केली जातात.तरी दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कोरोना काळात मयत झालेल्या कुटुंबातील वारसांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा असे बारामती संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष धनवान वदक व तहसीलदार विजय पाटील यांनी केले. सदर योजना तहसील विभागामार्फत राबविली जात असल्याची माहिती नायब तहसिलदार महादेव भोसले व अव्वल कारकून सुरेश जराड यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!