समाजाच्या सर्वांगीण प्रगती करिता मूल्य शिक्षणाची गरज -डॉ. पंडित विद्यासागर
मूल्यशिक्षण व संस्कारातून देश घडविता येतो..

समाजाच्या सर्वांगीण प्रगती करिता मूल्य शिक्षणाची गरज -डॉ. पंडित विद्यासागर
मूल्यशिक्षण व संस्कारातून देश घडविता येतो..
इंदापूर प्रतिनिधी –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर , कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भिगवन आणि श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिजवडी ता. इंदापूर येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे दि.24 जानेवारी ते 30 जानेवारी आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,’ समाजाच्या सर्वांगीण प्रगती करिता मूल्य शिक्षणाची गरज आहे. मूल्यशिक्षण व संस्कारातून देश घडविता येतो ,राष्ट्राची प्रगती साधता येते. राष्ट्रीय सेवा योजना हे मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याकरिता महत्त्वाची केंद्र ठरतात. युवकांनी शिबिर कालावधीतील मिळालेल्या ज्ञानाचा , अनुभवाचा आपल्या सर्वांगीण प्रगती करिता उपयोग करावा.
युथ फॉर डिजिटल भारत , युथ फॉर डिजिटल लिटरसी हा उद्देश घेऊन शिबिरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेचे संचालक विलास वाघमोडे म्हणाले की ,’ विद्यार्थ्यांनी श्रमाला न लाजता श्रम करण्याचे वळण लावून घ्यावे. चांगले कार्य करून स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांना या निवासी शिबिरातून श्रमाचे महत्त्व तसेच विविध उपक्रमशील कौशल्य आत्मसात करता येतील.
यावेळी संस्थेचे संचालक तुकाराम जाधव , भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज ,बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे , इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, कला शाखा विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी शिबिर कालावधीतील घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाविषयीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल बनसोडे यांनी आभार मानले.
रासेयो कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका मनीषा गायकवाड , प्रा. पुरुषोत्तम साठे ,डॉ. तयाजी लोंढे , कनिष्ठ विभागाच्या रासेयो कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका सुवर्णा जाधव , प्रा. धन्यकुमार माने यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला.