संभाजीनगरमधील वातावरण तापले! माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण
तिकीट न दिल्याने नाराजी व्यक्त

संभाजीनगरमधील वातावरण तापले! माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण
तिकीट न दिल्याने नाराजी व्यक्त
संभाजीन;प्रतिनिधि
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान संभाजीनगरमधील बायजीपुरा भागात मुस्लीम समाजात वर्चस्व असलेल्या एमआयएमच्या माजी खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची मारहाण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
पदयात्रा करताना कार्यकर्त्यांमधील भांडणामुळे या भागातील वातावरण तणावपूर्ण झाले.
जलील यांच्या पदयात्रेवर नाराज कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आणि कार थांबवून त्यावर बुक्या आणि पायांनी हल्ला केला. या हल्ल्यात जलील यांनाही मारहाण झाली. घटनास्थळी दोन गटांमध्ये जोरदार राडा आणि हाणामारी झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये Imtiaz Jalil सुरू झालेल्या या वादाचे कारण तिकीट न मिळाल्याशी संबंधित असण्याची माहिती समोर येत आहे. काही स्थानिकांनी दहा-बार वर्षे एमआयएमसाठी काम केले असून त्यांना तिकीट न दिल्याने नाराजी व्यक्त केली, असे एका बंडखोर कार्यकर्त्याने सांगितले. या विरोधामुळे जलील यांना पदयात्रा वळवून दुसऱ्या गल्लीत घेऊन जावे लागले, मात्र विरोध करणारे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन त्यांच्या मागे फिरत होते.छत्रपती संभाजीनगर शहरातील मुस्लीम बहुल भागांमध्ये 2014 पासून एमआयएमला मजबूत पकड असली तरी, सध्या या भागातच विरोध वाढल्याचे दिसून येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी सांगितले की, “सोळा तारखेला हा विरोध अधिक स्पष्टपणे दिसेल,” असे त्यांनी नमूद केले.या घटनेमुळे संभाजीनगरमधील निवडणूक प्रचाराचे वातावरण तणावपूर्ण झाले असून, पुढील काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज भासल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नेमका हल्ला कसा झाला?
जलील यांची गाडी जात असताना नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या थार गाडीवर हल्ला केला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी इम्तियाज जलील हे कारच्या पुढील सीटवर बसले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने इम्तियाज जलील यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी इम्तियाज जलील यांच्या गाडीत बसलेल्या कार्यकर्त्याच्या डोळ्याला जखमा झाल्या आहेत.प्रचार रॅलीदरम्यान ही घटना घडली आहे.
:
इम्तियाज जलील यांच्यावर कोणी हल्ला केला?
या घटनेनंतर संभाजीनगमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवार करीम कुरेशी यांनी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप केला आहे. आमच्या भागात अरेरावीची भाषा केली त्यामुळ हा प्रकार घडला, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमने 22 माजी नगरसेवकांची तिकिट कापून नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. ज्यावेळी उमेदवारी झाली त्यावेळी देखील राडा झाला होता. आजही त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात.





