इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची भाजपवर जहरी टीका

इंदापूर येथील कार्यक्रमात केलं भाष्य

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची भाजपवर जहरी टीका

इंदापूर येथील कार्यक्रमात केलं भाष्य

इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील सरस्वतीनगर येथे अजित देविदास ढवळे यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे उदघाटन आणि शिल्प व स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते संपन्न झाला.प्रसंगी बोलताना त्यांनी भाजपच्या रक्तातच मुस्लिम बांधवांबद्दल विष आहे.त्यांना जाब विचारला पाहिजे असे म्हणत जहरी टीका केली आहे.

काही पक्ष जातीपातीच धर्माचं वेगळ्या प्रकारे वीष पेरतात. मुस्लिम बांधवांवर खोटे आरोप करतात. काही मंडळी व काही पक्षाचे प्रमुख हे त्यांवर ठपका ठेवतात. शेवटी मुस्लिम असो वा हिंदू रक्त एकच आहे. आपण इंदापूर तालुक्यामध्ये हिंदू-मुस्लीम कधी मानत नाही. एकमेकांवर भावाप्रमाणे प्रेम करतो. परंतु काही पक्षांचे मंडळी मतांच्यासाठी हिंदू आणि मुस्लिम करतात. जे आजचे दंगे चालले आहेत त्यामागे मोठे षड्यंत्र आहे. मुंबईमध्ये काही गोष्टी चालल्या आहेत. कुठेतरी एका कुटुंबाला विशिष्ट आडनाव असल्याकारणाने टार्गेट केलं जातं याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. अशा जातीवादी पक्षांपासून की, ज्यांच्या रक्तातच किंवा त्यांच्या मेंदू मध्येच मुस्लिम बांधवांबद्दल विष आहे अशा भाजप सारख्या जातीयवादी पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे.असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की,मोठ-मोठ्या माणसांनी वक्तव्य केल्यामुळे चुकीचं होतंय. इंदापुरमध्ये आपण हिंदू मुस्लिम आहोत असं कुठं वाटतंय का? असे मतभेद झालेत का? कोणी चुकीचं काय केलंय का? परंतु मतासाठी ही काही पक्षांची मंडळी विष पेरून मन कुलोशित करून दंगे घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून आपण सावध राहिले पाहिजे.

Related Articles

Back to top button