बेळगाव

अन्यायकारक पद्धतीने कर्नाटकात गेलेली मराठीभाषिक गावे महाराष्ट्रात येईपर्यंत लढणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सीमालढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

अन्यायकारक पद्धतीने कर्नाटकात गेलेली मराठीभाषिक गावे महाराष्ट्रात येईपर्यंत लढणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सीमालढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

बेळगाव: बारामती वार्तापत्र

अन्यायकारक पद्धतीनं कर्नाटकात गेलेली सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी लढण्याचा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटकमध्ये गेलेली सीमाभागातील सर्व मराठी भाषीक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.

कर्नाटकात गेलेले शेवटचे मराठी भाषीक गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी लढणं हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अजित पवार यांनी आज सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.१९५६ मध्ये आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालीन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा अखंड लढा सुरू आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीने लढतील,असं अजित पवार म्हणाले.
‘संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर १८ जानेवारी १९५६ रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं.

आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाहीअसं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सीमालढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत,असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Back to top button