“येत्या मार्च महिन्यात पूर्णपणे अनलॉक होण्याचे संकेत; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती!
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट

“येत्या मार्च महिन्यात पूर्णपणे अनलॉक होण्याचे संकेत; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती!
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट
प्रतिनिधी
मार्च महिन्यात पूर्णपणे अनलॉक होण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “येत्या मार्च महिन्यात राज्यातील निर्बंध शिथिल केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा हीच मनीषा असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.
“गेल्या दोन महिन्यांपेक्षा आता राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. पॉझिटिव्हिटीमध्येही घट होत आहे. शिवाय राज्यात लसीकरणही चांगल्या प्रमाणात झाले आहे. राज्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 93 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर 67 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. याबरोबरच 15 ते 18 या वयोगटातील मुलांचेही 57 टक्के लसीकरण झाले आहे. सध्याही लसीकरण चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेच राज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत विचार सूरू आहेत. मुख्यमंत्र्यांचीही हिच इच्छा आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले, राज्यातील कोरोना परिस्थितीवर टास्क फोर्ससोबतही चर्चा झाली आहे. टार्स फोर्सचेही मार्च महिन्यात निर्बंध कमी करावेत असे मत आहे. याबरोबरच केंद्र सरकारनेही राज्यांनी कोरोनाचे निर्बंध कमी करावेत असे सांगितले आहे. या सर्वच गोष्टींचा विचार करून राज्यातील निर्बंध मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात शिथिल केले जातील.”