एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
आज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
आज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पुणे, प्रतिनिधी
पेट्रोल-डिझेलच्या भावावरून एकीकडे राजकारण चांगलंच तापलेलं असतांनाच दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आता सीएनजीच्या दराने 80 च्या आकडा पार केला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेले नागरिक सीएनजी गाड्या खरेदी करत आहेत किंवा आपल्या गाडीत सीएनजी किट बसवत आहेत. मात्र, आता सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होत असताना दिसून येत आहे. पुण्यात आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. पुण्यात आज सीएनजीच्या दरात 2 रुपये 20 पैसे प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. यामुळे आता पुण्यात सीएनजीचा दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलो इतका झाला आहे.
एप्रिल महिन्यात तब्बल चौथ्यांदा सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली. सीएनजी १५ रुपयांनी महागला असून वाहनधारक आणि रिक्षा व्यावसायिकांना फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईत मात्र सीएनजी- पीएनजी दर स्थिर आहेत.
‘एमएनजीएल’ च्या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी सीएनजीचा एक किलोचा दर ७७.२९ रुपये इतका आहे. घरगुती वापराच्या पीएनजीचा दर ४४.७० रुपये स्टॅंडर्ड क्युबिक मीटर इतका आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत गॅस वितरक कंपन्यांकडून सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ केली जात आहे.
पंतप्रधान मोदींकडून व्हॅट कमी करण्याच्या सूचना
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान, पीएम मोदी म्हणाले होते की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. राज्यांनाही त्यांचे कर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले. काही राज्यांनी येथे कर कमी केला आहे, परंतु काही राज्यांनी त्याचा लाभ नागरिकांना दिला नाही. यावेळी पीएम मोदींनी त्या राज्यांची नावंही सांगितली, ज्यांनी करात कपात केली नाही. ज्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड आणि केरळची नावं होती. पंतप्रधानांनी या राज्यांतील तेलाच्या किमतींचाही उल्लेख केला आणि आता ही राज्ये जनतेला दिलासा देण्याचे काम करू शकतात, असं सांगितलं होतं.