इंदापुरमध्ये बंधक केलेल्या मजुरांसह बालकांची सुटका

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई

इंदापुरमध्ये बंधक केलेल्या मजुरांसह बालकांची सुटका

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई

इंदापूर प्रतिनिधी –

रेडा (ता.इंदापूर) येथे कामाच्या ठिकाणी बंधक करून ठेवलेल्या २२ मजूर आणि १९, बालकांसह ४१ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. याप्रकरणी मुकादमासह ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल केला.

संदीप ताराचंद ठाकरे व इतर (रा.कन्नड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिका-यांकडे २५ मार्च रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांच्या परिवारातील व्यक्ती हे ऊसतोडीच्या कामासाठी १६ ऑक्टोबर २०२४ पासून मुकादम रघुनाथ धनाजी सोनवणे व इंदापूर तालुक्यातील ट्रॅक्टरमालक यांच्यासोबत इंदापूर तालुक्यात गेले होते. मुकादम सोनवणे व ट्रैक्टर मालक यांनी कामावर जाण्याअगोदर सर्व मजुरांना एकत्रित ११ कोयते (२२ मजुर) मिळून १२ लाख रुपये उचल दिलेली होती. आजपर्यंत कामावर ६ महिने होत आले आहेत. परंतु त्यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा हिशोब करून कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. तसेच, सर्व लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करीत नाही व जनावरांना सुद्धा चाऱ्याची सोय करून देत नसल्याने एका गायीचा मृत्यू झालेला आहे. ट्रॅक्टर मालक मजुरांकडून ८ लाख रुपयाची मागणी करत असून, पैसे न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे.

यामध्ये २२ मजुर व १९ लहान मुले, अशी एकूण ४१ लोक यामध्ये फसलेली आहेत. या लोकांना सोडवून द्यावे, तसेच, मुकादम सोनवणे व ट्रॅक्टर मालक यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी. त्यानुसार छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी व कामगार उपायुक्त यांना पत्र लिहीत कार्यवाहीची विनंती केली. त्यानुसार बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जीवन बनसोडे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी रेडा येथील संबंधित ठिकाणी भेट देत सर्व मजुरांची पोलिस बंदोबस्तात सुटका केली व त्यांना इंदापूर पोलिस ठाणे येथे आणले. त्यानंतर विष्णू नारायण गायकवाड (वय ३१, व्यवसाय मजुरी रा. नेवपूर, ता. कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ११ फेब्रुवारी २५ ते २६ मार्च २०२५ च्या दरम्यान नजर कैदेत ठेवणे, काठीने पायावर, महिलांना मारहाण करणे म्हाकून झालेल्या त्रासावद्दल व मारहाणीबाबत रघुनाय धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर, विकास संजय देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

        आम्हाला प्रशासनाकडून याबाबत स‌कार्य होत आहे. मात्र 66 आरोपीवरती ज्याप्रमाणे गुन्हा घडला त्याप्रमाणे कलमे लावून कारवाई होणे आवश्यक आहे. यामध्ये वरील सर्व मजूर हे आदिवासी मिल्ल जमातीचे असून, यामध्ये दोन महिला गरोदर आहेत. तसेच, दोन महिलांची तीन ते चार महिन्यांची बालके आहेत. अशा सर्वांना मारहाण करणे, उपाशी पोटी ठेवणे, बाल कामगार कतम, आदिवासी असत्याने त्याबाबतचे वेगळे कलम लावून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.

-अॅड. वीरसेन काजळे, सामाजिक संघटनेचे कायदेविषयक सल्लागार

 

     कामगारांची दयनीय अवस्था

इंदापूर पोलिस स्टेशनच्या परिसरात कामगारांना आणल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चहा नाश्त्याची सोय केली. यावेळी मजूर अतिशय भयभीत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच, महिला मजुरांकडे असलेल्या तीन ते चार महिन्याची बालकांची स्थिती पाहून हृदय हेलावून जात होते. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून कार्यवाहीची गरज स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!