विनायक लष्कर यांच्या ‘विमुक्ती कोलाहल’ कविता संग्रहास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार
लष्कर यांची १५ पुस्तके प्रकाशित

विनायक लष्कर यांच्या ‘विमुक्ती कोलाहल’ कविता संग्रहास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार
लष्कर यांची १५ पुस्तके प्रकाशित
बारामती वार्तापत्र
मातंग साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा २०२५ चा ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार’ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनायक लष्कर यांच्या ‘विमुक्ती कोलाहल’ या साहित्यिक कलाकृतीस दिला गेला.
महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पदमश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या शुभहस्ते व सुनील वेदपाठक प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, नांदेड, मुकुंदराव कुलकर्णी कार्यवाह रा.स्व.संघ, पुणे विभाग, अमितजी गोरखे सदस्य, विधानपरिषद, दिलीपजी कांबळे माजी मंत्री व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रा.विनायक लष्कर यांना देण्यात आला.
प्रा.विनायक लष्कर हे गेल्या १० वर्षांपासून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाच्या तज्ञ समिती सल्लागार म्हणून काम केले आहे. राज्य मागासवर्ग आयोग तज्ञ समितीवर सल्लागार म्हणून काम केले आहे.
त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भटक्या विमुक्त जाती जमाती अभ्यासकेंद्र स्थापना समिती व अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम केले आहे. प्रा.विनायक लष्कर यांची १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहेत. प्रा.विनायक लष्कर यांचे संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.