स्थानिक

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येणार असाल तर आनंदच,एमआयएम च्या प्रस्तावावर सुप्रिया सुळेंच बारामतीत मोठं विधान

विकासासाठी, कामासाठी सगळे एकत्रित येणार असतील आणि राज्याचे चांगले होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येणार असाल तर आनंदच,एमआयएम च्या प्रस्तावावर सुप्रिया सुळेंच बारामतीत मोठं विधान

विकासासाठी, कामासाठी सगळे एकत्रित येणार असतील आणि राज्याचे चांगले होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे

बारामती वार्तापत्र

एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मध्ये एमआयएम ला देखील सामील करून घेण्याची ऑफर महाविकास आघाडी समोर ठेवल्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.बारामतीत बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सावध प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे.

खासदार सुळे यांना इम्तियाज जलील यांच्या या ऑफर विषयी विचारले असता “राजकीय विषयांमध्ये कोणाला एकत्र काम करायचे असेल तर समविचारी पक्षांनी सगळ्यांनीच एकत्र आलेल आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी सगळे एकत्र येणार असतील आणि त्यातून राज्यासाठी काही चांगले होणार असेल तर ही कोणासाठी आणि कुठल्याही राज्यासाठी चांगलीच गोष्ट आहे” असल्याचे सूचक विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

यादरम्यान खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी परस्परविरोधी मते व्यक्त केल्याने राजकिय चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान,महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “औरंगजेबाच्या समोर नतमस्तक होणाऱ्यांसोबत शिवसेना कधीच जाऊ शकत नाही” असे म्हणत इम्तियाज जलील यांची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे.

शिवसेनेच्या भूमिकेवर राष्ट्रवादीची सावध प्रतिक्रिया

शिवसेनेच्या भूमिकेविषयी खासदार सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या कि जलील हे नेमकं काय म्हणालेत,नक्की काय झालं आहे या बद्दल मला फारशी माहिती नाही.सगळा विषय सविस्तर समजून घेतल्यानंतर मी बोलणं संयुक्तिक ठरेल.

किरीट सोमय्या सातत्याने संदर्भातील माहिती बाहेर देत आहेत. त्यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा एखाद्या परीक्षेमध्ये अथवा एखाद्या भरतीमध्ये त्याचा परीक्षेचा पेपर फुटला तेव्हा त्याची चौकशी होते. इथे तर सतत गोपनीय माहिती बाहेर पडत आहे. तेव्हा अर्थातच त्याची चौकशी झाली पाहिजे. ईडी, सीबीआय या सगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यांची माहिती अशी बाहेर येत असेल तर ही बाब देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेची बाब आहे. मी ही बाब अमित शहा यांच्या लक्षात आणून देणार आहे.

राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या विरोधात सातत्याने बोलत आहेत. ते महाविकास आघाडी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी वास्तवतेकडे बघते चित्राकडे बघत नाही.

Related Articles

Back to top button