कोरोंना विशेष

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; उपमुख्यमंत्री अजित पवार हा इशारा…मास्क वापरणे गरजेचं

या परिस्थितीवर राज्य सरकारचे लक्ष असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हटले.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; उपमुख्यमंत्री अजित पवार हा इशारा…मास्क वापरणे गरजेचं

या परिस्थितीवर राज्य सरकारचे लक्ष असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हटले.

मुंबई :प्रतिनिधी

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या रुग्णसंख्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. कोरोना  रुग्णसंख्या वाढली तर विचार करावा लागेल, असे अजिदादा म्हणाले.  नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचं असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांना टोला

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला. काही नेते मास्क वापरत नव्हते तर दुसऱ्यांदा कोरोना झाला. आता अडचण झाली आहे. काही जन ऑपरेशन करायला गेले तर त्याचे ऑपरेशन झाले नाही.  त्यामुळे प्रत्येकाची आरोग्य महत्वाचे असते हे लक्षात घ्या, अजित पवार म्हणाले.

राज्यात कोरोनाची चौथी लाट येतेय की काय अशी भीती आहे. कारण बुधवारी राज्यात 1081 रुग्ण आढळलेत. राज्याची रुग्णसंख्या हजारांपार गेलीय. मुंबईत काल 739 रुग्ण आढळलेत. राज्याची रुग्णसंख्या तीन दिवसांत दुप्पट झाली आगे. वाढत्या रुग्णसंख्येवर टास्कफोर्स लक्ष ठेऊन असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

Related Articles

Back to top button