तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा जे.जे. रुग्णालयात दाखल
आज सकाळी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी आणले आहे.

तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा जे.जे. रुग्णालयात दाखल
आज सकाळी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी आणले आहे.
मुंबई – प्रतिनिधी
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यांना जेल मिळते की बेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिस असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असं पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणांची प्रकृती खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात आता रुग्णालय प्रशासनाकडून महत्वाची माहिती समोर येतेय. नवनीत राणांच्या प्रकृतीबाबत काय सांगितलं रुग्णालय प्रशासनाने?
स्पॉंडिलायसिसचा त्रास – नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर ग्राहकाला जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यापासून त्यांना स्पॉंडिलायसिसची त्रास होत आहे. त्यासंदर्भात जे जे रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र जेल प्रशासनाने सिटीस्कॅन केले नसल्याने त्या संदर्भात त्यांनी जेल प्रशासन आणि लोकसभा अध्यक्ष यांना देखील वकिलांमार्फत पत्र पाठवले होते. त्यानंतर आज त्यांना कमी त्रास होत असल्याने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकसभा अध्यक्षांना पत्र – नवनीत राणा यांच्या वकिलांनी तक्रार भायखळा जेलच्या अधीक्षकांना यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसची समस्या आहे. जेलमध्ये सतत फरशीवर बसल्यानं आणि झोपण्यामुळं ही समस्या वाढत आहे. यामुळं नवनीत राणा यांना 27 एप्रिल रोजी जेजे रुग्णालयात घेऊन गेले. जेजेमधील डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं होतं. मात्र ते अजून केलेलं नाही. त्यांना गंभीर दुखण्याने ग्रासलं आहे. सीटी स्कॅन न केल्यानं उपचार काय करायचं हे ठरवू शकत नाही. आम्ही संबंधित यंत्रणेला अर्ज दिला मात्र त्यावर विचार केला गेला नाही. जर त्यांची प्रकृती बिघडली तर त्याला जबाबदार आपण असाल असंही आम्ही सांगितलं आहे असं पत्रात म्हटलं आहे. हीच तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पाठवली आहे.
काय आहे प्रकरण? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता, त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेलं. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर 30 एप्रिलला त्यांच्या जामीनावर सुनावणी घेण्यात आली. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आजही वेळेअभावी जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही आहे.