इंदापूर

वालचंदनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी केली घोषणा

वालचंदनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी केली घोषणा

इंदापूर : प्रतिनिधी

वालचंदनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करणार असल्याची घोषणा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी (दि.१४) केली.विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

राज्यमंत्री भरणे यांच्या प्रयत्नांतून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलितवस्ती मधील विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी यावेळी मंत्री भरणे यांचे जाहीर आभार मानले.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस मंत्री भरणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले व उपस्थित समाजाबांधवाना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की,माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याच्या राजकीय, सामाजिक जीवनात नेहमीच वालचंदनगरवासीय व येथील आंबेडकरप्रेमी जनता सदैव पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याने माझ्यासारख्याला विविध पदे भुषवता आली व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.

देशभरासह जगातील कोट्यावधी जनतेचे श्रध्दास्थान व प्रेरणास्थान असलेले विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य जागा उपलब्ध असणारे वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे इंदापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण असून अशा सुंदर उद्यानाच्या सुशोभीकरण व विकासाकरीता तातडीने १० कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करून तो तत्परतेने मंजूर करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.तसेच विकासकामांवर स्वतः लक्ष देऊन उद्यानातील विकासकामे दर्जेदार होण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे एम.डी ॲन्ड सीईओ चिराग दोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,फॅक्टरी मॅनेजर धिरज केसकर,वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांच्यासह वालचंदनगर परिसरातील आंबेडकरप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Related Articles

Back to top button