शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या शेततळ्यात बुडून दोघा भावांचा मृत्यू; दुर्देवी घटनेने परिसर हादरला

मुलं नेहमीप्रमाणे शेळ्या चरण्यासाठी गेले होते.

शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या शेततळ्यात बुडून दोघा भावांचा मृत्यू; दुर्देवी घटनेने परिसर हादरला

मुलं नेहमीप्रमाणे शेळ्या चरण्यासाठी गेले होते.

प्रतिनिधी

शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (death) झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील पाटे गावात घडली आहे. या घटनेमुळे पाटे गावावर शोककळा पसरली आहे. पाटे येथील प्रगतशील शेतकरी संजय तळेकर यांचा मोठा मुलगा ओम (१३) व लहान मुलगा साईल हे बुधवार (दि.17) सकाळी बारा वाजेच्या सुमारास शेत गट नंबर ७० लगत असलेल्या नाल्या जवळ बकऱ्या चरत होते.

मुलं नेहमीप्रमाणे शेळ्या चरण्यासाठी गेले होते. तेथे जवळच शेततळं होतं. शिवाय पावसामुळे शेततळं काटोकाट भरलं होतं. त्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूमुळे घरात शोककळा पसरली आहे.

यावेळी ते त्यांच्याच शेततळ्यातील पाण्यात पडले. शेततळे पूर्ण पाण्याने भरले असल्याने त्यांचा शोध घेण्यात वेळ लागला. जवळपास एक तासानंतर नागरिकांच्या मदतीने दोघांना पाण्यातून बाहेर काढीत त्यांना उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघेही मयत झाल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्या घरच्यांनी ओम अन साईलच्या नावाचा एकच टाहो फोडल्याने संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर सुन्न झाला होता. संजय तळेकर यांना ओम व साईल हे दोघेच मुले असल्याने त्यांचा अशा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण पाटे गावातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!