स्थानिक

उजनी पाणी प्रश्न पेटला, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, पवारांच्या निवासस्थानाचा बंदोबस्त वाढवला, दोघांना अटक.

उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ दोघा आंदोलकांना

उजनी पाणी प्रश्न पेटला, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, पवारांच्या निवासस्थानाचा बंदोबस्त वाढवला, दोघांना अटक.

उजनी धरणातील 5 टीएमसी पाण्यावरून सध्या पुणे विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटला आहे

बारामती वार्तापत्र

बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थेक वाढ करण्यात आली आहे.

उजनी धरणालगत यासंदर्भात बेमुदत धरणे आंदोलनास बसलेल्या आंदोलकांनी आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर बारामतीची पोलिस यंत्रणा सज्ज झाली. आज सकाळी काही आंदोलक बारामतीकडे निघाल्याचे समजताच पोलिसांनी सुरक्षा वाढवली व या दरम्यान आलेल्या दोन आंदोलकांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यातून १८ ते १९ टीएमसी सांडपाणी उजनी धरणात येते. या पाण्यावर प्रक्रिया करून पाच टीएमसी पाणी सणसर कट कालव्यांमधून इंदापूर तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त २२ गावांना देण्याचा निर्णय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला होता. मात्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला. या पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याविरोधात आंदोलन करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात उजणीच्या पाण्याचा प्रश्न पेटल्यानंतर अजित पवारांनीही कोणी कोणाचे पाणी पळवणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी भरणे यांचा निर्णय रद्द केला. त्यावर इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले, आणि आज त्यांनी दत्तात्रय भरणे यांनी घेतलेला ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णय कायम ठेवण्यात यावा अशी मागणी करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पवार यांच्या निवासस्थानी गोविंदबाग येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.तर बारामतीमधील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी  येथील ठिकाणी देखील सुरक्षा वाढवली.

यावरून सुरुवातीच्या काळात पालकमंत्री दत्तात्रय भरणे व नंतरच्या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पुतळे विरोधकांनी व आंदोलकांनी जाळले व निषेध केला. या नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील विविध ठिकाणी रास्ता रोको करून इंदापुरातील पाणीप्रश्नावर राजकारणाची फोडणी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button