कोणी ‘ मायचा लाल’आला तरी सुट्टी नाही,,अवैध सावकारीवर अजित पवार भडकले
तडीपार किंवा हद्दपारीची कारवाई करावी लागेल.

कोणी ‘ मायचा लाल’आला तरी सुट्टी नाही,,अवैध सावकारीवर अजित पवार भडकले
तडीपार किंवा हद्दपारीची कारवाई करावी लागेल.
बारामती वार्तापत्र
कायदा मोडून जर कोणी बारामतीकरांना अडचणीत आणणार असेल, कायदा जुमानणार नसेल तर त्याच्यावर तडीपारीची किंवा मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध खाजगी सावकारांना दिला.
बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. मागील काही महिन्यांपासून बारामतीत अवैध खाजगी सावकारकिची प्रकरणे बाहेर निघत आहेत. अनेक सामान्य लोकांना खाजगी सावकारांनी मेटाकुटीला आणले आहे.
शेतकर्यांना खाजगी सावकारांचा ही त्रास होत आहे अनेक सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यावर पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी कारवाई करून अनेक शेतकऱ्यांना सावकारांनी लुटलेल्या जमिनी परतही केल्या आहेत.मात्र खाजगी सावकारांनी जर सामान्य नागरिकाला वेठीस धरले तर मात्र त्याची गय केली जाणार नसल्याचे संकेत अजित दादा पवार यांनी यावेळी दिले.
सावकारी मध्ये कुणी अडकला असेल तर त्याच्यावर कारवाई झाल्यावर माझ्याकडे यायचं नाही दादा चुकलं, परत असं होणार नाही, असं चालणार नाही. जर कोण सापडला तर त्याच्यावर मोक्का किंवा तडीपारीची कारवाई होईल. कोणी मायचा लाल आला तरी त्याला सुट्टी नाही असं जाहीरपणे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आजच्या कार्यक्रमात सांगितले. त्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
सहकारी चळवळ मोडीत काढण्याची व अडचणीत आणण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. सहकारी बँकांसह इतर संस्थांवर केंद्राचे निर्बंध येत आहेत त्यामुळे सहकारी संस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सहकारावर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न चुकीचा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. बँकांना खात्रीचा कर्जदार मिळत नाही त्यामुळे बँकाही सावध भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या कार्यक्रमात अजित दादा पवार यांनी घेतलेल्या सावकारकिच्या भूमिकेमुळे बारामती पोलिसांचे मनोधैर्य वाढणार आहे. बारामती वार्तापत्राचे संपादकांनी पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की अवैध सावकारी वर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात आहे. नागरिकांची ,शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही व त्यांच्या जमिनी लाटण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी सर्व पोलिस यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी आपल्यावर झालेला अन्याय सहन न करता ,अवैध सावकारी बाबतीत तक्रार असल्यास बारामती शहर पोलीस स्टेशन शी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले