मुंबई

महाविकास आघाडीमधून धुसफूस पुन्हा,”शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज चित्र वेगळच असतं,” यशोमती ठाकूर

काळाची गरज आहे.

महाविकास आघाडीमधून धुसफूस पुन्हा,”शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज चित्र वेगळच असतं,” यशोमती ठाकूर

काळाची गरज आहे.

मुंबई :प्रतिनिधी

“शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज चित्र वेगळच असतं,” असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

ठाकूर यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमधून धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं मानले जाते आहे. शिवसेना नेत्या आणि विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलंय. पवारांना युपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडा असा टोला त्यांनी मारला.

महिला व बाल विकासमंत्री योशमती ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं, “शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर चित्र काही वेगळच असतं. शरद पवार काळाची गरज आहेत. कोणी कितीही तीर मारले तरी सरकार अस्थिर होणार नाही.”

अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री सुनील केदार आणि इतरही मान्यवर देखील मंचावर उपस्थित होते. मंत्री यशोमती ठाकूर मोठे विधान केल्याने आघाडीत बिघाडी होण्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार  हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते, असे वक्तव्य त्यांनी केले.  शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच, परंतु आज काळाची गरज आहे. ते आपल्या सोबत आहेत, म्हणून कोणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

भाजप आणि मनसे एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तीव्र शब्दांत टीका करत असताना दुसऱ्याबाजूला सरकारमधील मंत्र्यांनीच ‘शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत आणि ते काळाची गरज आहेत’ असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसच्या काही आमदारांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय परिस्थितीची चर्चा करण्यासाठी ही भेट हवी होती, असं काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.

महाविकास आघाडीत काँग्रेस अस्वस्थ आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button