कृषी

“विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत ९० गावांमध्ये शेतकऱ्यांशी थेट संवाद”

२९ मे ते १२ जून या कालावधीत

“विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत ९० गावांमध्ये शेतकऱ्यांशी थेट संवाद”

२९ मे ते १२ जून या कालावधीत

बारामती वार्तापत्र

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत “विकसित कृषी संकल्प अभियान” देशभरात खरीपपूर्व नियोजनाच्या अनुषंगाने राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बारामतीच्या कार्यक्षेत्रातील सात तालुक्यांतील ९० गावांमध्ये २९ मे ते १२ जून या कालावधीत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांचे तर्फे विविध कृषी उपक्रम राबवले जाणार आहेत.

या उपक्रमाद्वारे कृषी तंत्रज्ञानाची माहिती गावोगावी जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या अभियानात नाविन्यपूर्ण शेती, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, नैसर्गिक शेती, माती परीक्षणाचे महत्त्व, शेतीमाल ब्रॅंडिंग व विक्री व्यवस्था, तसेच बियाणे, खते, रोपे आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.

कृषी विज्ञान केंद्र बारामतीमार्फत दररोज प्रत्येक तालुक्यात दोन टीमद्वारे सहा गावांमध्ये कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

या टीममध्ये संशोधन केंद्रातील अधिकारी, कृषी अधिकारी, आत्मा अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच संबंधित विद्यापीठाचे तज्ञ सहभागी होणार आहेत. ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शेती व संबंधित व्यवसायाबाबत आधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार आहेत.

या अभियानाची सुरुवात गुरुवारी माळेगाव येथील राजहंस संकुलातून होणार आहे. प्रत्येक गावांमध्ये शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सभासद व महिला शेतकरी यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे.

हे अभियान शेतकऱ्यांना माहितीपूर्ण, आधुनिक व टिकाऊ शेती पद्धतीकडे घेऊन जाणारे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button