पुणे जिल्यातील 80 कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी विज्ञान केंद्रा मध्ये प्रमाण पत्र वाटप…
दुकानदारांनी आपले रेकॉर्ड योग्य रित्या ठेवावे.

पुणे जिल्यातील 80 कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी विज्ञान केंद्रा मध्ये प्रमाण पत्र वाटप…
दुकानदारांनी आपले रेकॉर्ड योग्य रित्या ठेवावे.
बारामती वार्तापत्र
कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी आपले दुकान म्हणजे शेतकऱ्यांसाठी लर्निंग सेंटर आहे असे काम करावे व ते फॅशिलिटेशन सेंटर व्हावे असे मत श्री राजेंद्र साबळे,प्रकल्प संचालक आत्मा पुणे यांनी व्यक्त केले ते अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषि विज्ञान केंद्रामध्ये कृषि निविष्ठा विक्रेता धारकांसाठी कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाच्या प्रमापत्र वाटप कार्यक्रमातबोलत होते.
या वेळी व्यासपिठावर उप विभागीय कृषि अधिकारी श्री वैभव तांबे,केंद्र प्रमुख डॉ रतन जाधव,विषय विशेषज्ञ श्री संतोष गोडसे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले लॉक डाऊन असूनही चांगले प्रशिक्षणाचे काम झाले आहे.
वयाच्या ५५ वर्षापर्यंतचे विक्रेत्यांनी हा कोर्स पूर्ण केला आहे.आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात ८०० पेक्षा जास्त विक्रेत्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना आपल्या दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग झाला आहे.दुकानदारांनी आपले रेकॉर्ड योग्य रित्या ठेवावे.तसेच भविष्यात सेंद्रिय शेती ,नैसर्गिक शेती, रेसिडू फ्री उत्पादनाला महत्व राहणार आहे.मध्यप्रदेश, गुजरात मध्ये यावर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.आपल्या राज्यात ही काम सुरु आहे.
उप विभागीय कृषि अधिकारी श्री.तांबे साहेब म्हणाले ज्यांचे कृषि पदवी किंवा कृषि पदविका झाली आहे किवा रसायन शास्त्र विषयासह इतर पद्वी झाली आहे अशा व्यक्तीनाच कृषि ची औषधे आणि खते व बियाण्याचे परवाने मिळत आहेत परंतु ज्यांच्याकडे या पदव्या नाहीत परंतू दुकान सुरु आहे अशा दुकानदारसाठी त्यांचे परवाने नूतनीकरण करताना अडचण येऊ लागल्यानेच कृषि निविष्ठा विक्रेता धारकांसाठी कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम (देशी) मॅनेज हैदराबाद व वनामती नागपूर तर्फे सुरु केला व त्या विक्रेत्यांना विविध पिकांचे खत व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन इत्यादीबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.
गावामध्ये शेती विषयक सल्ला घेण्यासाठी शेतकरी प्रथम अशा विक्रेत्या कडे जातो व तो नेहमी उपलब्ध असतो.शेतकर्याना योग्य सल्ला व निविष्ठा दिल्यास त्याचे उत्पादन वाढते गावामध्ये एकरी ४० टन ऊस घेणारे व एकरी १०० टन ऊस घेणारे शेतकरी असतात ही तफावत योग्य मार्गदर्शन व नियोजनाने कमी होईल.सध्या ड्रोन द्वारे फवारणी यंत्रासाठी ४० टक्के पासून ७५ टक्के पर्यत अनुदान योजना आहे त्यासाठी आमच्या कडे अर्ज येत आहेत
केंद्र प्रमुख डॉक्टर जाधव म्हणाले आज 80 कृषी निविष्ठा धारकांना प्रमाणपत्र वाटप होत आहे आणखी नवीन बॅच साठी अर्ज मागवले आहेत ती बॅच एप्रिलमध्ये सुरू होईल. केंद्रामार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबविले जात आहेत त्यामध्ये सेंद्रिय शेती ,जमीन आरोग्य व्यवस्थपन, रसायन अंशमुक्त शेती ,क्षारपड जमीन व्यवस्थापन,निचरा प्रणाली ,ड्रोन तंत्रज्ञान व त्यासाठी चालणारी प्रशिक्षणे,इ. चा लाभ शेतकऱ्यांनी व युवकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .
या अभ्यासक्रमात उच्च गुणांनी पास झालेले चार निविष्ठाधारकाचा सत्कार करण्यात आला यामध्ये श्री रणदिवे प्रभाकर,श्री यतीन शहा ,श्री मंगेश गरुड आणि,श्री अण्णासो आटोळे हे होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष गोडसे व सुनील शिरसीकर यांनी केले, आभार श्री गणेश शिंदे यांनी मानले. सर्व निविष्ठा विक्रेत्यांनी योग्य मार्गदर्शनाबद्दल श्री सुनील शिरसागर व श्री गणेश शिंदे यांचा सत्कार केला.
कृषी निविष्ठा विक्रीते प्रतिक्रिया
१) पराग शहा – आम्ही ढोबळ मानाने औषधे, खते,बियाणे कोणत्याही औषध मध्ये कोणते औषध खत मिसळून फवारणी करायचो. या कोर्समुळे चांगले ज्ञान मिळाले आता योग्य सल्ला देता येतोय.
२) अण्णासाहेब आटोळे (शिरसुफळ)-पूर्वी डायरेक्ट लायसन मिळत होते परंतु ज्ञान नव्हते या कोर्समुळे बरेचसे डाउट क्लिअर झाले. लागवड ते काढणी पश्चात पर्यंत योग्य मार्गदर्शन करता येते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. आमचेही वाढले व सहली मधून राहुरी, पाडेगाव, डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, चांगली माहिती मिळाली.
३) रायते बजरंग (सणसर) आमच्याकडे शेतीची पदवी नसताना या कोर्समुळे आमचे भाग्य उजळले व आमचे परवाने नूतनीकरण होत आहेत व शेतकऱ्यांना योग्य ज्ञान देता येत आहे.