पुन्हा एकदा शाळा दार खुले,पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू;आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे.

पुन्हा एकदा शाळा दार खुले,पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू;आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे.

प्रतिनिधी

राज्यातील महाविद्यालय १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अलीकडेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. पण, आता पालकांकडून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरू करण्यास होकार दर्शवला आहे.

‘आता शाळा सुरू केल्या आहे. जवळपास सगळीकडे ज्युनिअर कॉलेज सुरू केले आहे. शाळा सुद्धा सुरू झाल्या आहेत.  १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा आपला मानस आहे. आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याचा विचार करत आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.

तसंच, ‘विद्यार्थ्यांना जर कमी प्रमाणात कोरोनाची लागण झाली तर मुलांना कुठे लक्षणं दिसत नाही, लगेच ते बरेही होत आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा जालन्यात निर्णय घेतला आहे, असंही टोपेंनी स्पष्ट केलं.

कॉलेज 1 तारखेपासून होणार सुरू

दरम्यान,  राज्यात आता हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. तसंच राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे असंही नाही. त्यामुळे राज्यातील शाळांप्रमाणेच कॉलेजेसही सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना पाळून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरु करावीत असा विचार शासनापुढे विचाराधीन आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच म्हणजेच येत्या 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व कॉलेजेस सुरू होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तशी मान्यता शासनाकडून देण्यात अली आहे. मात्र यापुढील निर्णय हा जिल्ह्यातील महानगरपालिकांकडे सोपवण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक अशा जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बघून कॉलेजेस सुरु होणार आहेत.

Related Articles

Back to top button