सोलापूर

ऊस लागवड वाढत राहिली तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल ‘माझे शब्द लिहून ठेवा’ ; नितीन गडकरी

"दुसरीकडे ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे.

ऊस लागवड वाढत राहिली तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल ‘माझे शब्द लिहून ठेवा’ ; नितीन गडकरी

“दुसरीकडे ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे.

प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांना गंभीर इशारा दिलाय. “सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्रशिंग होतंय, पण हा ऊस असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

“.तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल”

“एवढ्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात ऊसाचं क्रशिंग होतंय. मात्र, हा ऊस असाच जास्त लावत राहाल, तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा. कारण साखर सरप्लस झाली,” असा इशारा नितीन गडकरी यांनी दिला.

“ब्राझिलमध्ये साखर वाढली तर साखरेचा दर.”

नितीन गडकरी पुढे म्हणाले, “माझ्याकडे दोन दिवसांपूर्वी ब्राझिलचे मंत्री आणि शिष्टमंडळ आलं होतं. ब्राझिलमध्ये दुष्काळ पडला म्हणून बबनराव तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण ब्राझिलमध्ये साखर वाढली तर साखरेचा दर २२ रुपये प्रतिकिलो भाव होईल.”

ते सोलापूरमध्ये बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “आज पाणी हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण पाणी उपलब्ध केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. ते पाणी जर ड्रीपने दिलं तर फारच चांगलं आहे. सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता. आता बबन दादा सांगत होते त्यांचं २२ लाख टन ऊसाचं क्रशिंग झालं.”

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या सोलापूरच्या समन्वित विकासासाठी आज सोलापूर येथे ८,१८१ कोटी रुपये किंमतीच्या व २९२ किमी लांबीच्या १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी रस्ते, वीज कृषी आदी विषयांवर मनोगत व्यक्त केलं. याच भाषणात वाढत्या ऊस उत्पादनावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

नितीन गडकरी काय म्हणाले?

“सोलापूर हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा होता. मला आत्ता आमदार बबनदादा शिंदे सांगत होते, यंदाच्या साली सोलापूर जिल्ह्यात २२ लाख टन ऊसाचं गाळप झालं. इतक्या मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करण्याची पाळी येईल”

“माझ्याकडे २ दिवसांपूर्वी ब्राझीलचं शिष्टमंडळ आलं होतं. तिथे दुष्काळ पडला, असं ते सांगत होते. तिथे दुष्काळ म्हटल्याबरोबर आमदार बबनदादा शिंदे हसले खरे पण ब्राझीलमध्ये जर साखर वाढली तर २२ रुपये सारखेचा भाव होईल आणि तुम्हाला ऊसाचा भाव काही कमी करता येणार नाही. कारण तुम्हाला राजकारण करायचंय. तुम्हाला आता आहे तेवढाच भाव द्यावा लागेल. मग तेव्हा काय स्थिती होईल, ते बघा… “, असं नितीन गडकरी म्हणाले.

“दुसरीकडे ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे. त्यामुळे ऊसाचा भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा,” असं म्हणत नितीन गडकरी यांनी कारखानदारांना इशारा दिला.

Back to top button