बारामतीतील प्रभाग रचना अन्याय्य – सर्वपक्षीय प्रतिनिधींकडून शरद पवार यांना निवेदन
प्रभाग रचनेचे कोणतेही संकेत न पाळता मनमानी पद्धतीने विभागणी करण्यात आली आहे.

बारामतीतील प्रभाग रचना अन्याय्य – सर्वपक्षीय प्रतिनिधींकडून शरद पवार यांना निवेदन
प्रभाग रचनेचे कोणतेही संकेत न पाळता मनमानी पद्धतीने विभागणी करण्यात आली आहे.
बारामती वार्तापत्र
राज्य निवडणूक आयोगाने बारामती नगर परिषद क्षेत्रासाठी दिलेल्या प्रभाग रचनेतील अन्याय्यतेबाबत सर्व पक्षीय शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते मा. खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले. प्रभाग रचनेत लोकसंख्या व भौगोलिक स्थितीच्या निकषांचे पालन न केल्यामुळे दलित, अल्पसंख्याक व वंचित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की, शहरातील काही भागांमध्ये एकाच समाजाचे एकत्रित प्रभाग तयार करून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. तसेच, काही भागांमध्ये प्रभाग रचनेचे कोणतेही संकेत न पाळता मनमानी पद्धतीने विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे समाजाच्या न्याय्य प्रतिनिधित्वास बाधा निर्माण झाली आहे. हे सर्वपक्षीय पदाधिकारी विविध राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
यावेळी युवा नेते श्री युगेंद्र पवार हे सुद्धा उपस्थित होते…
या निवेदनावर पुढील प्रमुख सर्वपक्षीय नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत:
1. ऍड. अशोकराव इंगुले – राष्ट्रवादी काँग्रेस
2. श्री. काळुराम चौधरी – बसपा
3. डॉ. सुधीर पाटसकर – मनसे
4. श्री. सुजित वायसे – भाजप
5.श्री. सुनील दादासाहेब सस्ते – विरोधी पक्ष नेते
6. श्री. फैय्याज इलाही शेख – AIMIM
7. ऍड. संदीप गुजर – राष्ट्रवादी काँग्रेस (श.पा.गट)
8. श्री. सत्यव्रत काळे – राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श.पा.गट)
9. मंगलदास निकाळजे – जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी
10. श्री. वीरधवल गाडे – काँग्रेस आय
11. ऍड. राहुल शिंदे – शिवसेना (ठा.बा.गट)
12. श्री. रवींद्र सोनवणे – RPI (आठवले गट)
13. ऍड.अमोल सातकर – राष्ट्रीय समाज पक्ष
14.अभिजित कांबळे – अध्यक्ष, RPI (आठवले गट)
शिष्टमंडळाने शरद पवार यांना विनंती केली की, त्यांनी स्वतः या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निवडणूक आयोगाशी चर्चा करून नव्याने व न्याय्य पद्धतीने प्रभाग रचना करावी, जेणेकरून वंचित समाजाचा आवाज दबला जाणार नाही.