इंदापूर व माळशिरस तालुक्यातील नीरा नदी काठच्या शेतकरी वर्गाला चांगला दिलासा.
अनेक वर्षानंतर नीरा नदी जून पासूनच वाहतेय .

इंदापूर व माळशिरस तालुक्यातील नीरा नदी काठच्या शेतकरी वर्गाला चांगला दिलासा.
अनेक वर्षानंतर नीरा नदी जून पासूनच वाहतेय .
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
अनेक वर्षानंतर प्रथमच जून महिन्यापासून नीरा नदी वाहत असल्याचे समाधानकारक चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या शेतकरी वर्गाला चांगला दिलासा मिळाला आहे.
इंदापूर व बारामती तालुक्यात जून महिन्यापासून आजपर्यंत सतत जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी हे ओढे – नाल्यांमधून नदीपात्रात आले असून त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून नदी पाण्याने भरून वाहत आहे.
या नदीवरील वीर, भाटघर, गुंजवणी,नीरा देवधर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने सध्या या धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे धरणांमधून नदीपात्रात पाणी न सोडताही केवळ पावसाच्या पाण्यामुळे नीरा नदी पाण्याने भरून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा मिळाल्याची माहिती दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक दयानंद गायकवाड (बोराटवाडी) यांनी दिली. दरम्यान,सध्या नदीचे पाणी वाहून वाया जात असल्याने सदरच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी शासनाने जल तज्ञांचा अभ्यास गट नेमावा, असे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.