बारामती पोलिसांचे नेमकं चाललंय काय?
कायद्याचा धाक दाखवत सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे.

बारामती पोलिसांचे नेमकं चाललंय काय?
कायद्याचा धाक दाखवत सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती पोलीस नेहमीच आपल्या कार्यात सतर्क असतात,तथापि अलीकडच्या काळात कोरोना महमारीच्या पार्श्वभूमीवर नियमांचा बाऊ करत दुचाकी,चारचाकी वाहन धारकांना वेठीस धरण्याचे प्रमाण जास्तच झाले असल्याचे मत सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.यामध्ये देखील नागरिकांचे प्रबोधन करण्या ऐवजी दंडात्मक पवतीवर अधिक भर दिला जात असल्याचे विदारक दृश्य पहावयास मिळत आहे.
यामध्ये कायद्याचा धाक दाखवत सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे.याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधितांना सूचना देण्याची गरज आहे.
दरम्यान बारामतीचे विभागीय अधिकारी यांच्यासह पोलीस निरीक्षकानी शुक्रवार दि.01 रोजी बारामतीच्या सर्व चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करत विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली,मात्र दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात नियमांची ऐशी…तैशी करत अनेक नेते,कार्यकर्ते पोलिसांच्या नाकावर टिच्चून वावरताना दिसत असताना पोलीस मात्र धृतराश्ट्राच्य भूमिकेत दिसेल.एकूणच बारामती पोलिसांचे नेमकं चाललंय काय? असा सवाल सुजाण नागरिक विचारत आहेत.
चौकट…व्यथा एका शेतकऱ्याची
पाहुणे वाडी येथील एका शेतकरी तरकरी घेऊन बारामतीला गेले होते,तरकरी विकून त्यांना एकूण ७०० रुपये मिळाले होते,बारामतीतील काम उरकून ते घरी जात असताना ढवाण पाटील चौकट पोलिसांनी अडवत ५०० रुपये दंड केला,अनेक विनवण्या करून हतबल झालेला गरीब काबाड कष्ट करणारा शेतकरी ५०० रुपयांची पावती फाडत उर्वरित २०० रुपयातील १०० रुपयांचे पेट्रोल दुचाकित भरून फक्त १०० रुपये घेऊन घराकडे गेले.